- News
- जिल्हा न्यूज
- धक्कादायक : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून ४ शेतकऱ्यांची आत्महत्या!, १ जानेवा...
धक्कादायक : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून ४ शेतकऱ्यांची आत्महत्या!, १ जानेवारीपासून आजवर २२ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दीपक भागाजी वाघ (वय ४२, रा. शफियाबाद, ता. कन्नड), भगवान मारोती मोकासे (वय ५२, रा. पिशोर, ता. कन्नड), तायराम गणपतराव गवळे (वय ७०, रा. हळदा, ता. सिल्लोड), अजय ज्ञानेश्वर मगर (वय २५, रा. तांदूळवाडी, ता. गंगापूर) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. जिल्ह्यात १ जानेवारी ते २४ फेब्रुवारीदरम्यान तब्बल २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकारकडून आत्महत्या रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत, की विरोधकांनाही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ मिळताना दिसत नाही.
घटना चौथी : सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तायराम गवळे यांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास शेतातील वखारीत विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बडोदा बँकेसह बुलडाणा अर्बन बँकेचे कर्ज होते. नापिकीमुळे हप्ते थकले होते. कर्ज फेडण्याची त्यांना चिंता होती. या घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
25 Feb 2026 17:58:23
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...

