- Marathi News
- सिटी क्राईम
- विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पलायनाला बाल कल्याण समिती जबाबदार, शासनाने समिती केली बरखास्त!
विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पलायनाला बाल कल्याण समिती जबाबदार, शासनाने समिती केली बरखास्त!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यादीप बालसुधारगृहातील असुविधा आणि छळामुळे ९ मुलींनी ३० जूनला आक्रमक होत सिनेस्टाइल पलायन केले होते. या घटनेला बाल कल्याण समितीचे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचे समोर आले होते. अखेर शासनाने जिल्हा बाल कल्याण समिती सोमवारी (११ ऑगस्ट) बरखास्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाल कल्याण समितीचा अतिरिक्त कार्यभार परभणीच्या समितीकडे सोपविण्यात आला आहे.
क्रूर वागणूक आणि छळाला कंटाळून विद्यादीप बालसुधारगृहातून एकाचवेळी ९ अल्पवयीन मुलींनी ३० जूनला सकाळी पलायन केले होते. बालसुधारगृहातील लाइट फोडून हातांवर जखमा करून घेत दगड, चाकू, लोखंडी रॉड हाती घेऊन त्या पळत सुटल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. छावणी पोलिसांसह दामिनी पथकाने जिल्हा न्यायालयासमोर ५ तर रेल्वेस्थानक परिसरात २ मुलींना ताब्यात घेतले होते. २ मुली पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्या. त्यातील एक मुलगी स्वतःच्या घरी गेली होती. ती नंतर आईसह बालकल्याण समितीसमोर आली. नववी मुलगी ४ दिवसांच्या शोधानंतर शुक्रवारी शिवाजीनगरमध्ये मिळून आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
By City News Desk
चिकलठाणा, गजानननगरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By City News Desk
भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव
By City News Desk
Latest News
14 Aug 2025 07:57:22
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...