- News
- सिटी क्राईम
- अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक सं...
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कंपनीत एकत्र काम करताना ओळख झालेल्या आणि घराजवळ राहत असल्याने मैत्री होऊन नंतर जवळीक वाढलेल्या २६ वर्षीय विवाहित तरुणीला त्याने वाळूज एमआयडीसीतून पळवून नेले. तुळजापूर, अहिल्यानगर, कर्जत आणि नंतर खुलताबाद तालुक्यातील कान्होबा वडोद... असा प्रवास करत हे युगुल २० दिवसांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अवतरले. यादरम्याच्या काळात त्याने आपल्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तरुणीने प्रियकरावर लावला आहे. त्यामुळे प्रियकर आता कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकला आहे.
इकडे ज्या दिवशी पत्नी बेपत्ता झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणीच्या पतीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती. पोलीस तरुणीचा शोध घेत होते. तपासात गिरजारामनेच तिला पळवून नेल्याचे समोर आले. मोबाइल लोकेशन, संपर्कातील व्यक्ती, संभाव्य ठिकाणे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस दोघांचा कसोशीने शोध घेत होते. २० दिवस उलटून चालले तरी पत्नीचा शोध लागत नसल्याने पती चिंताग्रस्त होता. याच दरम्यान पोलिसांनी गिरजारामच्या भाऊजीला कॉल केला होता. आपणच तरुणीला पळवल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याचे कळल्याने गिरजारामचे धाबे दणाणले. त्यानंतर तो तिला घेऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आला. मात्र आणताना त्याने धमकी दिली, की तू तिथे जाऊन मी तुला पळवून नेले असे सांगू नको..., असे तरुणीने म्हटले असून, तिने गिरजारामविरुद्ध तक्रार दिली. गिरजारामने पतीला जीवे मारण्याची धमकी देत तिला पळवून नेले आणि जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास
पोलिसांनी जवळपास २० विविध ठिकाणी तपास केल्यानंतर तरुणी आणि गिरजाराम पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनैतिक संबंधातून दोघे पळून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र तरुणीने गिरजारामविरुद्ध तक्रार दिल्याने तो आता चांगलाच कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अधिक तपास पोलीस करत असून घटनाक्रमातील सर्व बाबींची सत्यता तपासली जात आहे.

