राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी आता चांगले काम करावे. पुढे जाऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत, असा खोचक टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला. दरम्‍यान, जंजाळ यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, की मी पालकमंत्रीही होऊ शकतो...

जंजाळ हे उपमहापौरपदी विराजमान होताच त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना ‘आता कसं वाटतंय.. गोड गोड वाटतंय...’ ‘मोठ-मोठे गार केले, गंमत नाही, तू कोणाच्याही नादी लाग रग्गीलच्या नादी नको, लय महागात पडल’ असे पोस्टर्स झळकवले होते. त्यावर जंजाळ यांनी प्रतिक्रिया देताना, पालकमंत्र्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते. त्यांनी माझ्या उपमहापौरपदाच्या उमेदवारीला विरोध करायला नको होता. जल्लोष माझा नव्हे तर तो कार्यकर्त्यांचा राग होता. त्यांच्या भावनांना मी कुठेतरी वाट मोकळी होऊ दिली, असे म्हटले होते. नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या मंत्री शिरसाट यांना पत्रकारांनी जंजाळ यांच्या वक्‍तव्‍याबाबत विचारले असता त्यांनी जंजाळ हे मुख्यमंत्री होवोत, असा टोला लगावला.

गटनेत्याच्या नियुक्तीवरून पेटले
महापालिकेत गटनेता नियुक्तीवरून सध्या मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात वाक्‌युद्ध रंगले आहे. शिरसाट हे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या त्र्यंबक तुपे यांच्यासाठी आग्रही आहेत, जंजाळ यांनी पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडून वेगळा मार्ग निवडल्यानंतर सर्वात आधी त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांपैकी राजेंद्र जंजाळ हे आले होते. त्यावेळी जे लोक गद्दार म्हणून हेटाळणी करत होते, ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात आले. त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या भोवती कोंडावळा केला, तसे शिरसाटांच्या सोबत सावलीप्रमाणे राहणारे जंजाळ दूर दूर होत गेले.

नगरपालिका निवडणुकीत अगदीत त्यांना पक्षाच्या बैठकांनाही बोलावणे टाळले जाऊ लागले. मात्र नंतरच्या काळात जंजाळ यांना एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पक्षात महत्त्व देण्यात आले आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. उपमहापौरपदी जंजाळ यांच्या नियुक्‍तीलाही शिरसाट यांनी विरोध केला होता. आता गटनेतेपदावरून दोन्ही नेत्‍यांत वाद सुरू झाला आहे. या वादात आता एकनाथ शिंदे हे कुणाच्या बाजूने झुकते माप देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरसाट यांनी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना १३ पैकी १० नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. मात्र, जंजाळ यांनी हा दावा फेटाळला आहे. जोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकृत निरोप येत नाही, तोपर्यंत गटनेते पदाचा निर्णय होणार नाही, असा पवित्रा जंजाळ यांनी घेतला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!

Latest News

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले! राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...
नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
१,४३७ तरुण-तरुणींची जागेवरच जॉबसाठी प्राथमिक निवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात झाला मेळावा, मुंबई-पुण्याच्याही कंपन्यांनी घेतला सहभाग
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software