घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : व्हॅलेंटाइन वीकमध्येच एक दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. घरच्यांचा विरोध डावलून तरुणाने प्रेमविवाह केला. त्यांच्या प्रेमवेलीवर फुलही उमलले. मात्र नंतर या जोडप्यात असे काही घडले, की त्याने आत्‍महत्‍या केली असून, बेगमपुरा पोलिसांनी त्याच्या आत्‍महत्‍येप्रकरणी त्याच्या पत्‍नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (९ फेब्रुवारी) पहाटे पावणेदोनला (मध्यरात्री) पहाडसिंगपुऱ्यातील लॉजवर घडली.

रविनाथ उर्फ धनंजय रामकृष्ण बर्डे (रा. वाळूज) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. रविनाथचे भाऊ अमोल रामकृष्ण बर्डे (वय ३०, रा. हरीओमनगर, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की रविनाथ हा त्याची पत्नी शिवानीसह वाळूज येथे राहत होता. त्यांना १८ महिन्यांचा मुलगा आहे. रविनाथने लग्न कधी केले हे त्याच्या घरी माहीत नव्हते. कोरोना काळात २०२० मध्ये तो पत्नीला घेऊन घरी आला होता. घरच्यांना त्याने सांगितले होते, की मला शिवानीसोबत लग्न करायचे आहे. मात्र घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर रविनाथ व शिवानी निघून गेले.

दीर्घकाळ उलटल्यानंतर तो व त्याची पत्नी त्यांच्या मुलासह अधूनमधून घरी येऊ लागले. रविनाथचा १४ डिसेंबर २०२५ रोजी वाढदिवस असल्याने तो एकटाच घरी आला होता. त्याने घरी सांगितले, की पत्नी शिवानी माझ्यावर संशय घेऊन नेहमी भांडते. पत्नी मुलालाही भेटू देत नाही व फोनवरून तुला मुलाचे तोंड पाहू देणार नाही, असे म्हणून त्रास देत आहे, असे सांगितले होते. सोमवारी (९ फेब्रुवारी) पहाटे पावणेदोनला शिवानीने कॉल करून अमोल यांना सांगितले, की तुमच्या भावाने फाशी घेतली आहे. त्यानंतर सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी परत कॉल करून सांगितले, की तुमच्या भावाने फाशी घेतली किंवा नाही हे तुम्ही पहा. रविनाथच्या मित्राने अमोल यांना कॉल करून सांगितले, की रविनाथने फाशी घेतली असून त्यास घाटी रुग्णालयात नेले होते. त्याचा मृत्‍यू झाला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

रविनाथच्या भावाने शिवानीवर केले आरोप
रविनाथचे भाऊ अमोल यांनी शिवानीवर तक्रारीत आरोप केले आहेत, की शिवानीने कोणत्या तरी मुलीसोबत बोलतो, असा संशय घेऊन मानसिक त्रास देऊन त्याच्या सोबत सतत भांडण करून, त्यास त्याच्या मुलासोबत बोलू न देता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तिच्या त्रासाला कंटाळून सोमवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास त्याने पहाडसिंगपुऱ्यातील श्री साई लॉज (गुरुगणेशनगर) येथे गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. त्याला डॉक्टरांनी तपासून पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी मृत घोषित केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!

Latest News

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले! राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...
नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
१,४३७ तरुण-तरुणींची जागेवरच जॉबसाठी प्राथमिक निवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात झाला मेळावा, मुंबई-पुण्याच्याही कंपन्यांनी घेतला सहभाग
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software