- News
- सिटी डायरी
- नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा नियोजन समितीची बैठक आज, १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी सन २०२६-२७ च्या १५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. आराखड्यात ७६५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली आहे. विकासकामे करताना ती त्या त्या क्षेत्रानुसार समायोजित करावीत. जेणेकरून कामांचे नियोजन करणे सुलभ होईल, असे मंत्री शिरसाट म्हणाले.
सन २०२५-२६ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणकरिता ७३५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी १०४ कोटी रुपये तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना १० कोटी ४६ लक्ष रुपये असा एकूण ८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा आढावा या वेळी पालकमंत्र्यांनी घेतला.
सन २०२६-२७ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणकरिता वित्तीय मर्यादा ५२६ कोटी ८३ लक्ष रुपये इतकी होती. यंत्रणांनी प्रत्यक्षात २०३१ कोटी ९७ लक्ष रुपयांची मागणी केली असून १५०० कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा आहे. सन २०२५-२६ च्या तुलनेत सन २०२६-२७ साठी ७६५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली. त्यास समितीची मान्यता देण्यात आली. सादरीकरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन भारत वायाळ यांनी केले.
-आ. प्रशांत बंब यांनी शालेय शिक्षणाचा खालावत चाललेला दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांचा अहवाल मागितला होता. समिती समोर सादर झालेला अहवाल हा वस्तुनिष्ठ नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईसह अहवाल सादर करावा, असे सांगितले. पालकमंत्री शिरसाट यांनी या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ बैठक घेऊन अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.
-आ. रमेश बोरनारे यांनी ग्रामीण भागात विद्युत रोहित्रे निकामी होण्याचे प्रमाण वाढत चालले असून त्यासाठी जादा निधी द्यावा, अशी मागणी केली.
-आ. विलास भुमरे यांनी क्षेत्रनिहाय प्राप्त रोहित्र व त्याचे वितरण याचा अहवाल वीज वितरण कंपनीने सादर करावा, अशी मागणी केली. निरंतर योजनेचा अहवालही सादर करावा, अशी मागणी केली. पैठण शहरात आलेल्या महापुरात निकामी झालेले रोहित्र तातडीने बदलून मिळावे, अशी मागणी केली.
-मंत्री अतुल सावे यांनी शासकीय इमारतींचे सौंदर्यीकरण करावयाचे असल्याने त्या कामासाठी जादा निधी शिल्लक ठेवावा, असे निर्देश दिले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
By City News Desk
Latest News
12 Feb 2026 22:25:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...

