पैठण स्टोरी : १८ वर्षीय हिंदू तरुणीचे दोन धर्मांधांनी बळजबरीने दुचाकीवर बसवून केले अपहरण, लव्ह जिहादचा संशय, सकल हिंदू समाजाचा शहरात मोर्चा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या केरळ स्टोरी-२ हा चित्रपट गाजत आहे. यात हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून कसे अत्याचार केले जातात, याचे चित्रण केले आहे. तशीच पैठण स्टोरी समोर आली आहे. एका १८ वर्षीय हिंदू मुलीचे दोन धर्मांधांनी बळजबरीने मोटारसायकलीवर बसवून अपहरण केले आहे. विरोध करणाऱ्या मुलाला दोघांनी लाथ घालून पाडले आणि तरुणीला घेऊन पसार झाले. ही धक्कादायक घटना बुधवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी ३ च्या सुमारास घडली. पैठण पोलिसांनी दोघा अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चार पोलीस पथके त्यांच्या शोधात लावण्यात आली आहेत. या घटनेमुळे पैठणमध्ये खळबळ उडाली आहे. आज, १ मार्चला शहरात सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून घटनेचा निषेध करत आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

चिराग फारुकी (रा. पैठण) याने साथीदारासोबत मिळून हे अपहरण घडवून आणले आहे. चिराग हा महाराष्ट्र कॉम्प्युटर सेंटर नावाने क्लासेस चालवतो. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असून, चिरागच्या मित्रपरिवाराची आणि नातेवाइकांची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे आणि पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर कसोशीने मुलीचा शोध घेत आहेत. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ते बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी मोठ्या भावाकडे पैठणच्या संतनगर भागात मुलीला शिक्षणासाठी ठेवले होते. पीडित मुलगी ऐश्वर्या (नाव बदलले आहे) कॉम्प्युटर क्लासेससाठी महाराष्ट्र कॉम्प्युटर सेंटरमध्ये जात होती.

तिला तेथील शिक्षक चिराग फारुकी हा शिकवत होता. गेल्या आठवड्यात ऐश्वर्याने घरी सांगितले होते, की चिराग हा तिला त्याच्यासोबत लग्न कर, असे म्हणत होता. त्यामुळे तिने एक आठवड्यापासून क्लासेसला जाणे बंद केले होते. बुधवारी दुपारी तीनला ऐश्वर्या घरी असताना चिरागने साथीदारासह येऊन तिला आवाज दिला. ऐश्वर्या गेटकडे गेली असता चिरागने मुलीचा हात पकडून ओढले. मुलगी आरडाओरड करू लागल्याने तिथेच असलेल्या एका मुलाने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चिरागने त्याला लाथ मारून खाली पाडले.

चिरागसोबत असलेला व्यक्ती लगेचच एमएच २० एफबी ४७७९ क्रमांकाची एचएफ डिलक्स हिरो कंपनीची मोटारसायकल घेऊन आला. दोघांनी ऐश्वर्याला बळजबरीने गाडीवर बसवले आणि सुसाट पळवून नेले. ऐश्वर्याच्या नातेवाइकांनी तिचा पैठण शहरात शोध घेऊनही ती न मिळून आल्याने पोलिसांत धाव घेतली. मुलगी १८ वर्षे ११ महिने वयाची आहे. तिला बळजबरीने लग्न करण्यासाठी किंवा अन्य अनैतिक कारणासाठी पळवून नेल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software