राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर हे बौद्ध धम्म शिक्षणाचे मोठे केंद्र होते. या शहराची नाळ बौद्ध धम्मासोबत जोडलेली आहे. अजिंठा व वेरूळ ही जागतिक दर्जाची वारसा स्थळे असून, इथल्या लेणींची निर्मिती आमच्या पूर्वजांनी केली आहे. डॉ. बाबासाहेबांनी या शहरात मिलिंद आणि नागसेनवनाची निर्मिती केली आणि मराठवाड्यातील शिक्षणाचा अंधार दूर केला. हा देश बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुसंस्कृत बौद्ध नागरिक व भिक्खू निर्माण करण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.

विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी येथे आयोजित पाच दिवसीय जागतिक धम्म परिषदेत तिसऱ्या दिवशी शनिवारी (२८ फेब्रुवारी) ते बोलत होते. भीमराव आंबेडकर म्हणाले, की महाबोधी महाविहाराचे आंदोलन पेटलेले आहे. हे महाविहार बौद्धांच्या हातात द्या, ही साधी मागणी आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र सुनावणी होत नाही. एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय आहे. राम जन्मभूमीचा प्रश्न आला तेव्हा सांगण्यात आले, की हा करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न आहे. महाबोधी महाविहाराचा प्रश्न आला तर सांगितले गेले की पुरावे दाखवा. संघर्ष केल्याशिवाय आपणास काही प्राप्त होत नाही. पण विजय सत्याचाच होतो, गौतम बुद्धांचा धम्म सत्याचा आहे. त्यामुळे सत्याचाच विजय होईल, असे आंबेडकर म्हणाले. रोज १० हजार उपासक, उपासिकांच्या भोजनाची व्यवस्था या धम्म परिषदेत करण्यात आली आहे. राज्यभरातून उपासक, उपासिका मुक्कामी आल्या आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी

Latest News

पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी पिसादेवीतील थरार : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने दोन भावांना भोसकले, तिसऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड‌!; दोघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून टोळक्याने ३ भावांवर सशस्त्र हल्ला चढवला. दोघांना चाकूने भोसकून...
३०० कोटी खर्चून झालेली १०६ सिमेंट रस्त्यांची कामे बोगस?; सरफेस खराब, खडी येतेय बाहेर, २३० कोटी घेतल्यानंतर कंत्राटदार दुरुस्तही करून देईना!!, छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीची अस्मार्ट कामे...
राम जन्मभूमीसाठी करोडो लोकांच्या आस्थेचा प्रश्न, महाबोधी महाविहारासाठी म्हणतात पुरावे दाखवा!; भीमराव आंबेडकर यांची न्याय व्यवस्थेवर टीका
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकरण तापणार, वाद पेटणार : खा. भुमरेंच्या नोटिसीला अंबादास दानवे उत्तर देणार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software