- News
- जिल्हा न्यूज
- फुलंब्रीत ‘मशाल’ पेटली !; भाजप हरली, सुहास शिरसाट यांच्या पराभवाचे कारण काय...
फुलंब्रीत ‘मशाल’ पेटली !; भाजप हरली, सुहास शिरसाट यांच्या पराभवाचे कारण काय...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी भाजप उमेदवार सुहास सिरसाट यांचा तब्बल १,७९७ मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीत सिरसाट यांनी अवघ्या १९० मतांनी विजय मिळवला होता. यंदा मोठ्या फरकाने ते हरले.
फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने अनेक खेळ्या केल्या. मात्र त्या सर्व अंगलट आल्या. यात सर्वांत मोठी खेळी होती, ती शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी उमेदवारी मागे घेतली आणि लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे शिंदे गटाची नाराजी नाहक शिरसाट यांना सहन करावी लागली. ढोके राहिले असते नसते तरी भाजपला फारसा पडणार नव्हता. काटशहाचे राजकारणाचे शिरसाट बळी ठरले असे आता म्हटले जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र कट्टर कार्यकर्ता राजेंद्र ठोंबरे यांना मैदानात उतरवले होते. भाजपचे तोडफोडीचे राजकारण मतदारांना रूचले नाही. शिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत सुहास शिरसाट हे आमदारकीचे तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत होते. भविष्यात ते डोईजड ठरतील, यामुळेही त्यांचा पराभव घडवून आणण्यासाठी भाजपमधीलच एक गट कार्यरत होता, असे आता बोलले जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
By City News Desk
विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी
By District Correspondent
४२ वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्या, कन्नड तालुक्यातील नादरपूरची घटना
By City News Desk
Latest News
14 Feb 2026 19:23:55
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...

