...तर १६ मार्चपासून छत्रपती संभाजीनगर शहराचे पाणी बंद!; पाटबंधारे विभागाची महापालिकेला लेखी नोटीस, ६५ कोटी रुपये थकले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण येथील जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभाग महापालिकेकडून दरमहा बिल वसूल करतो. मात्र, महापालिकेने बिल वेळेत न भरल्याने तब्बल ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे आता जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला नोटीस बजावून १५ मार्चपर्यंत एकरकमी ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपये भरा अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.

३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीवर भर दिला असून, त्यातून महापालिकेलाही लेखी नोटीस बजावली आहे. महापालिकेने चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीचे २५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यात शंभर कोटी रुपये थकबाकीचे आहेत. १ एप्रिल ते २ मार्चपर्यंत पाणीपट्टी वसुली १८ कोटी ४५ लाख ५६ हजार ४९५ रुपये झाली आहे. मनपाने पाणीपट्टी ४ हजार रुपयांवरून २ हजार ५० रुपये केली तरीही अनेक नागरिक पाणीपट्टी भरत नाहीत. १ लाख २० हजार नळ जोडण्या सध्या महापालिकेच्या रेकॉर्डवर आहेत.

समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करा, महापौरांची प्रशासनाला सूचना...
आम्हाला सहाव्या, आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. सिडको एन ५ पाण्याच्या टाकीसमोरील प्रभागाला चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी वाटप सुरू आहे. सर्वांना समन्यायी पद्धतीने पाणी द्या, अशी मागणी सिडको एन ३ प्रभागाचे नगरसेवक प्रमोद राठोड, बालाजी मुंडे यांनी आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन केली. गुलमोहर कॉलनी, सिडको एन ५ परिसर आदी भागात चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. एकाच जलकुंभावरून वसाहतींना पुरवठा होतो. मग सिडको एन ३ भागात सहाव्या, आठव्या दिवशी पाणीपुरवठा का, असा प्रश्न केला. दरम्यान, महापौर समीर राजूरकर यांनी समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती दिली. पाणीपुरवठ्यातील गॅप एक दिवसाने कमी होईल, याची अंमलबजावणी १५ मार्चपासून होण्याची शक्यताही राजूरकर यांनी व्यक्त केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software