धुलिवंदन साजरे करून अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या ४ मुलांचा बुडून मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई/ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात होळीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी उल्हास नदीत चार किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५-१६ वयोगटातील मुले धुलिवंदन साजरे केल्यानंतर आंघोळीसाठी नदीत उतरले होते आणि पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले. हे चारही विद्यार्थी दहावीत होते. उल्हास नदी ठाणे, रायगड आणि […]

मुंबई/ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात होळीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी उल्हास नदीत चार किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५-१६ वयोगटातील मुले धुलिवंदन साजरे केल्यानंतर आंघोळीसाठी नदीत उतरले होते आणि पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले. हे चारही विद्यार्थी दहावीत होते. उल्हास नदी ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांमधून वाहते.

बुडालेल्या मुलांची ओळख पटली असून त्यांची नावे आर्यन मेदार (१५), ओम सिंग तोमर (१५), सिद्धार्थ सिंग (१६) आणि आर्यन सिंग (१६) अशी आहेत. हे सर्वजण चामटोली येथील पोद्दार गृह संकुलातील रहिवासी आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली होती. यापूर्वी महाराष्ट्रात नदीत बुडण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यानंतर सरकारने अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपली मुले गमावली त्यांच्यासाठी होळीचा सण दुःखाचा बनला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software