- News
- पॉलिटिक्स
- राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!
राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या शिंदे गटात सध्या वर्चस्ववाद सुरू आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. थेट जंजाळांना हटवून माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना जिल्हाप्रमुख करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यामुळे वाद अधिकच भडकला आहे. जंजाळांना उत्तर देण्यासाठी तुपे यांना पुढे करण्यात आल्याचे चित्र आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे शिंदे गट भाजपच्या तुलनेत तयारीत मागे ढकलला गेला आहे.
त्र्यंबक तुपे यांना जिल्हाप्रमुख करणार असल्याच्या चर्चेवर जंजाळ म्हणाले, की तुपे फुलंब्रीचे संपर्कप्रमुख असतानाच तेथील नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि तीन नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यांच्या या ‘कर्तृत्ववान' कामामुळेच कदाचित पालकमंत्री शिरसाट त्यांना जिल्हाध्यक्ष बनवतील. पालकमंत्री मालक आहेत आणि कुणालाही जिल्हाध्यक्ष बनवू शकतात. त्यांना त्र्यंबक तुपे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की आनंदा ढोके यांना जंजाळ यांनीच पक्षात आणले होते. सागर लॉनमध्ये जंजाळ यांनीच त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले होते. ढोकेंना शिवसेना तालुकाप्रमुख करण्याचे आश्वासन त्यांनीच दिले होते. मी दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलो आहे. त्यामुळे माझा फुलंब्रीचा संपर्क कमी होता. त्यामुळे जंजाळ यांनीच त्यांना भाजपत पाठवले, असा माझा आरोप आहे. माझ्या बदनामीचे त्यांचे हे कटकारस्थान असावे, अशी मला शंका आहे, असे तुपे म्हणाले.
अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी सहकाऱ्यांसह शुक्रवारी (५ डिसेंबर) मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. करंजखेड जिल्हा परिषद गटाची उमेदवारी माजी आमदार नितीन पाटील यांचे पूत्र अर्जुन पाटील यांना जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी जाहीर केल्याने गाडेकर नाराज होते. गाडेकर यांनी करंजखेड जि.प. गटातून निवडणूक लढविण्याची तयारी चालविली होती. मात्र काही दिवसांपूर्वी करंजखेड येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात सतीश चव्हाण यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्जुन पाटील यांचे नाव जाहीर केले होते. तेव्हापासून गाडेकर हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या ठाकरे गटात पक्षप्रवेशावेळी अंबादास दानवे उपस्थित होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 06:48:26
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...

