- News
- पॉलिटिक्स
- औद्योगिक नगरीने मंत्री शिरसाटांच्या उमेदवार निवडीवर केले प्रश्नचिन्ह उभे!; मशाल पेटल्याने आत्मचिंतन
औद्योगिक नगरीने मंत्री शिरसाटांच्या उमेदवार निवडीवर केले प्रश्नचिन्ह उभे!; मशाल पेटल्याने आत्मचिंतन होणार?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (संजय निकम : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज औद्योगिक नगरीचा निकाल हा केवळ जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीचा आकडा नाही, तर तो पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या राजकारणाला दिलेला स्पष्ट आणि धोक्याचा इशारा आहे. कारण विकासाचे फलक, निधीचे आकडे, उद्घाटनांचे फोटो एका बाजूला अन् मतपेटीतून आलेला संदेश वेगळाच आहे. मंत्री शिरसाट यांच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पडले आहे!
मंत्री संजय शिरसाट हे मतदारसंघात करत असलेल्या विकासकामांबद्दल दुमत नाही. त्यांना विधानसभा निवडणुकीत वाळूज औद्योगिक नगरीतून चांगले मताधिक्क्य मिळाले. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड चुकली, असे आता म्हटले जात आहे. पुढे पुढे करणाऱ्या आणि पक्षाच्या नावाने घरे भरणाऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी वाढली होती. त्याचा परिणाम निकालावर झाला. या निकालातून तरी काम करणारे आणि केवळ पुढे पुढे करणारे कार्यकर्ते कोण आहेत, हे मंत्री शिरसाट यांनी ओळखावे, अशी अपेक्षा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्ष आणि मंत्री शिरसाटांचे नाव पुढे करून गब्बर झालेल्यांना हा निकाल तडाखा आहे. निवडणुकीत वडगाव गट नंबरचा पाणीप्रश्नही चर्चेत राहिला. शिरसाटांचा बालेकिल्ला बाहेरून पाडलेला नाही, तर तो आतून पोखरला गेलेला आहे, असे आता म्हटले जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
10 Feb 2026 20:38:13
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह...

