महत्त्वाची बातमी : समीर राजूरकर महापौरपदी विराजमान, बहुमताने निवड, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर आणि उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांची ७० विरुद्ध ३३ अशा बहुमताने निवड झाली आहे. आज, १० फेब्रुवारीला सकाळी ११ ला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची विशेष सभा झाली, तीत निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, मंत्री संजय शिरसाट, खा. संदिपान भुमरे यांनी नवनियुक्त महापौर, उपमहापौरांचे अभिनंदन केले.

सुरुवातीला उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यानंतर १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आले. त्यानंतर ११५ नगरसेवकांपैकी भाजपच्या ५७ आणि शिंदे गटाच्या १३ अशा एकूण ७० नगरसेवकांनी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार समीर राजूरकर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांनी हात उंचावून मतदान केले. एमआयएमनेही या निवडणुकीत उमेदवार दिले होते. त्यांचे महापौरपदाचे उमेदवार अशोक हिवराळे आणि उपमहापौरपदाचे उमेदवार मोहम्मद वसीम अहमद  यांना त्यांच्याच पक्षाची ३३ मते मिळाली. त्यामुळे त्यांना पराभूत घोषित करण्यात आले. या निवडणुकीत एक ऐतिहासिक प्रसंग घडला. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सहाही नगरसेवकांनी तटस्‍थ भूमिका घेतली. असे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांच घडले. वंचित बहुजन आघाडीच्या ४ आणि शरद पवार गट १ नगरसेवकांनी तटस्‍थ राहून मतदानात भाग घेतला नाही. काँग्रेसच्या १ नगरसेविका सभेला अनुपस्थित राहिल्या. संविधान हातात धरून महापौर राजूरकर यांनी संविधानानुसार महापालिकेत कामकाज पाहणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करण्यात आला. महापालिकेची पहिली निवडणूक १९८८ मध्ये झाली होती. २०१५ पर्यंत सहा निवडणुका झाल्या. मात्र कोणत्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. यंदा मात्र भाजप बहुमताजवळ गेला.  

jajnal
राजेंद्र जंजाळ हे या निवडणुकीला कुटुंबासह हजर राहिले.

सर्वसाधारण प्रवर्गातील यापूर्वीचे महापौर
गजानन बारवाल (१८-४-१९९६ ते ७-५-१९९७),
सुदाम सोनवणे (२०-४-१९९९- ते २९-४-२०००),
किशनचंद तनवाणी (२९-४-२००५ ते ४-११-२००६),
विजया रहाटकर (२९-१०-२००७ ते २८-४-२०१०),
त्र्यंबक तुपे (२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६)
भगवान घडमोडे (१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७).

कोण आहेत राजूरकर अन्‌ जंजाळ...
समीर सुभाष राजूरकर हे प्रभाग १७ ड मधून निवडून आले आहेत. त्यांना नगरसेवक होण्याचीही इच्छा नव्हती. त्यांच्याकडे निवडणूकप्रमुखपदाची जबाबदारी होती. त्यांचे शिक्षण बी.कॉम. झालेले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव शुभांगी असून, मुले रणवीर आणि स्वामिनी आहेत. जी सध्या उच्‍चशिक्षण घेत आहेत. त्यांचा सामाजिक कार्याचा प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुरू झालेला आहे. भाजयुमोत काम केल्यानंतर त्यांची भाजपमध्ये कारकिर्द झाली. संघटन कौशल्यासाठी ते ओळखले जातात.

632622905_1472532117568257_63480 (1)

राजेंद्र हिंमतराव जंजाळ हे प्रभाग २२ ड मधून निवडून आलेले आहेत. त्यांचे शिक्षण बी. ए. एल. एल. बी. झालेले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव माधुरी असून, त्यांना यथार्थ आणि विराज ही दोन मुले आहेत. ते २०१०, २०१४ मध्ये नगरसेवक राहिले आहेत. स्थायी समिती सदस्‍य, दोन वर्षे सभागृहनेता, २०१९ मध्ये उपमहापौर राहिलेले आहेत. मूळ शिवसेनेत असताना युवा सेनेचे उपसचिव होते. एकनाथ शिंदेंसोबत आल्यानंतर जिल्हाप्रमुख झाले. ते कट्टर हिंदुत्वववादी असून, आक्रमक स्वभाव आणि संघटन कौशल्य आहे.
संपर्क क्रमांक : समीर राजूरकर मो. ९४२२७०६७९७, राजेंद्र जंजाळ : ९४२२२१४६१७, ९३७१०२९८७८

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...

Latest News

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर... मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह...
गंगापूरच्या भेंडाळ्याचा अंकुश यवतमाळमध्ये चालवायचा सेक्स रॅकेट!, अश्विनीसाठी करायचा घाणेरडे काम...
महत्त्वाची बातमी : समीर राजूरकर महापौरपदी विराजमान, बहुमताने निवड, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ
औद्योगिक नगरीने मंत्री शिरसाटांच्या उमेदवार निवडीवर केले प्रश्नचिन्ह उभे!; मशाल पेटल्याने आत्मचिंतन होणार?
हर्सूलजवळ भीषण अपघात : दुभाजकाला धडकताच कार तिनदा उलटून ३० फूट उंच उडून तरुणांवर कोसळली!; एका तरुणाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software