मंत्री शिरसाटांना भाजपला स्पष्ट इशारा : आमचा संयम जास्त काळ टिकणार नाही, काही लोकांना पैशांची मस्ती, त्या जोरावर फोडाफोडी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महायुतीत फोडाफोडी करायची नाही हे ठरले असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांना पैशाची मस्ती आली असून, ते त्या जोरावर फोडाफोडी करत आहेत. याचा अहवाल एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. हे असेच चालू राहिले तर आमचा संयम जास्त काळ राहणार नाही. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आम्ही एखादे पाऊल उचलले तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला दिला आहे.

शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर यांनी रविवारी (२३ नोव्‍हेंबर) भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर फुलंब्रीमध्ये थेट शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच भाजपने फोडला. त्यामुळे शिंदे गट कमालीचा बिथरला आहे. आता तर अशी चर्चा सुरू झाली आहे, की जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हेही भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पालकमंत्री शिरसाट सतर्क झाले असून, त्यांनी भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा देत युती धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे.

मित्रपक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घ्यायचे नाही हे त्यांनी ठरवले आहे. तरीही स्थानिक पातळीवर पैशांच्या जोरावर फोडाफोडी केली जात आहे. आम्ही कोणत्याही भाजप पदाधिकाऱ्याला प्रवेश देत नाही. मग भाजपकडून आमचे उमेदवार, पदाधिकारी फोडणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी केला. सुरवात त्यांनी केली आहे. आम्ही अजून संयम राखून आहोत. हा संयम जास्त काळ राहणार नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. लोकं ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश देणे होत नाही, असे ते म्हणाले.

राजेंद्र जंजाळ यांची चर्चा...
दरम्यान, सध्या निर्णप्रक्रियेतून सातत्याने डावलले जात असल्याने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ते सध्या पालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर दिसून येत आहेत. याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना नाराज असल्याच्या वृत्ताला जंजाळ यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, की मला कुठल्याही ‎‎निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. ‎त्यामुळे उपमुख्यमंत्री ‎‎एकनाथ शिंदे यांना माझा निर्णय सांगणार आहे. ठाकरे गटातून आलेल्या नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे,‎ विकास जैन, किशनंचद ‎तनवाणी यांची सध्या शिंदे गटात चलती आहे. त्यामुळे शिवसेना फुटल्यानंतर जे पदाधिकारी आधीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software