खुलताबादच्या भद्रा मारुती संस्थानकडून भाविकांची लूट!

On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचा गैरफायदा घेऊन खुलताबादच्या श्री भद्रा मारुती संस्थानकडून भाविकांची सर्रास लूट सुरू आहे. पार्किंग शुल्‍कातून ही लूट होत असल्याच्या भाविकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आधी २० रुपये कारसाठी घेतले जात होते. आता ५० रुपये वसूल केले जात असल्याने भाविकांनी संताप व्यक्‍त केला असून, ट्रस्टींनी ठेकेदारांच्या आडून देवस्थान  लुटीचे केंद्र बनवल्याच्या तक्रारी व्यक्‍त होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही लूट थांबविण्याची मागणी होत आहे.

भद्रा मारोती हे जागृत देवस्थान असून, या ठिकाणी वर्षभर गर्दी असते. त्‍यातच श्रावण महिन्यात ही गर्दी कित्‍येक पटींनी वाढते. सध्या श्रावण सुरू असल्याने भद्रा मारुतीच्या दर्शनाला रोज हजारो भाविक येत आहेत. ही संधी साधून देवस्थानच्या ट्रस्टींनी पार्किंग ठेकेदाराच्या आडून भाविकांची लूट सुरू केली आहे. त्‍यामुळे भाविक संतापले आहेत. पार्किंग ठेकेदाराने वसुलीसाठी नेमलेल्या लोकांशी भाविकांचे वाद होत आहेत. हा प्रकार थांबविण्याची मागणी भाविकांनी केली आहे. एका भाविकाने छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजकडे तक्रार करताना सांगितले, की मी कुटुंबासह दर्शनाला गेलो. पार्किंगमधून कार काढताना ५० रुपयांची पावती घेऊन वसुली कर्मचारी आला. त्‍याला मी २० रुपये रोज घेतात, आज इतके पैसे का, असे विचारले असता त्‍याने श्रावण महिन्यात आता ५० रुपयेच वसूल केले जात असल्याचे सांगितले. हा प्रकार लुटीचाच असल्याची भावना भाविकाने व्यक्‍त केली.

इतका निधी जातो कुठे?
दर्शनासाठी येणारा कोणताही भाविक मंदिराच्या दानपेटीत १०० रुपयांपासून हजारो रुपये टाकतो. त्‍यातून सोयी-सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात. याशिवाय सरकार निधी देतेच. मात्र पैसा थेट देवस्थानचा असल्याने ट्रस्टींमध्ये बसलेल्या काहींचा उद्देश साध्य होत नाही. त्‍यामुळे अशापद्धतीने ठेकेदार नेमून अव्वाच्या सव्वा पार्किंग वसुली करून ठेक्‍याच्या निमित्ताने वसुली होत असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software