बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!

On

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्‍यातील दोन घटनांनी शेतकऱ्यांत खळबळ उडवली आहे. संतापलेल्या दोन बैलांनी आपल्या मालकाचे जीव घेतले. पळाशी शिवारात एक बैल उधळल्याने कासरा गळ्यात अडकून फासत बसत तरुण शेतकऱ्याचा मृत्‍यू झाला, तर वरठाण येथे चारापाणी करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला बैलाने शिंग खुपसले. गंभीर जखमी होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

घटना पहिली : सोयगाव तालुक्यातील पळाशी शिवारात गट क्र. ३०५ मध्ये सोमवारी (२८ जुलै) सायंकाळी सहा वाजेच्या लखन नामदेव शिंदे (वय २४) हा शेतकरी स्वतःचे दोन्ही बैल बांधावर चारत होता. अचानक त्यातील एक बैल उधळला. हातातील बैलाचा कासरा अचानक गळ्याशी येऊन लखनला फास बसला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मंगळवारी दुपारी बाराला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आज, ३० जुलैला दुपारी दोन वाजता घटनेचा महसूल विभागाने पंचनामा केला.

घटना दुसरी : बैलांना चारापाणी करत असताना बैलाच्या जोरदार शिंगांच्या मारामुळे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (२९ जुलै) रात्री आठच्या सुमारास वरठाण (ता.सोयगाव) येथे घडली. धनसिंग नथ्थु सोळंके (वय ६५) असे मृत्‍यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते वरठाण येथे राहत होते. धनसिंग यांच्या मालकीच्या चार म्हशी, दोन गाई आणि बैलजोडी असून गावाच्या स्मशानभूमीजवळच त्यांचा गोठा आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास त्यांनी म्हशी व गायींना चारापाणी दिल्यानंतर बैलांना चारा टाकताना, एका बैलाने अचानक जोरात शिंग मारल्याने ते गंभीर जखमी झाले.

रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणांनी ही घटना पाहून गावात जाऊन नातेवाईकांना कळवले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने पाचोरा येथील खासगी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सपुरा कादरी यांनी बुधवारी (३० जुलै) सकाळी अकरा वाजता मृतदेहाचे उत्तरीय तपासणी केली. बनोटी पोलीस चौकीमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर दुपारी एक वाजता वरठाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software