- News
- जिल्हा न्यूज
- छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीचा ६ वा बळी : एकाच गावातील आणखी एका शेतकऱ्याची ४ दिवसांच्या फरकाने आत्...
छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीचा ६ वा बळी : एकाच गावातील आणखी एका शेतकऱ्याची ४ दिवसांच्या फरकाने आत्महत्या, शर्टाने झाडाला घेतला गळफास!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा मिळण्यात होत असलेली दिरंगाई त्यांच्या संयमाचा बांध तोडताना दिसत आहे. सोयगावपासून शेतकरी आत्महत्येचे सुरू झालेले सत्र गंगापूर, पैठण आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरूच आहे. अतिवृष्टीचा आता ६ वा बळी गेला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बकापूर पळशी येथील आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वरझडी शिवारातील माळरानावर शेतकऱ्याने शर्टाच्या साहाय्याने झाडाला गळफास घेतला. ही खळबळजनक शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी समोर आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १०० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तातडीने सरसकट मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. सत्ताधारी आमदारांनी तोंडदेखली पाहणी केली. पण प्रत्यक्षात मदतीची कवडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पंचनामे करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सिल्लोडमध्ये सरपंच मंगेश साबळे यांचे आंदोलनही दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
तुमचे वॉशिंग मशीन खूप वीज वापरते? वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा टिप्स
By City News Desk
विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
14 Dec 2025 21:47:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...

