- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली. खाद्यपदार्थांचे स्टॉलही तयार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान बुधवारी (१८ फेब्रुवारी) सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गुरुवार, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सर्वत्र रमजानची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, रोजेदार बांधवही याची आतुरतेने वाट पाहत आहेत. रमजानच्या अनुषंगाने बाजारातही खरेदीसाठी चांगलीच झुंबड उडत आहे. शहरातील सर्वच मशिदींमध्ये रात्री 'तरावीह'च्या विशेष नमाजचे आयोजन केले आहे.
गुरुवारी पहाटे पहिल्या रोजासाठी सहर केली जाईल. पाच वेळा न चुकता नमाज अदा करणे, सायंकाळी इफ्तार, रात्री ‘तरावीह'ची नमाज अदा करणे ही प्रत्येक रोजेदार बांधवांची दिनचर्या राहील. या शिवाय अनेक बांधव पवित्र धर्मग्रंथाचीही तिलावत करत असतात. सर्वसामान्य दिवसांपेक्षा रमजान महिन्यात ‘नेकीयाँ' ७० पटीने वाढलेल्या असतात. त्यामुळे रोजेदार बांधवांनी सतत ‘जिक्र' आणि ‘तिलावत' मध्ये मन रमवावे, असे आवाहन जामीया इस्लामिया काशीफ-उल-उलूमचे मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताही यांनी केले आहे.
या महिन्यात मुस्लिम पहाटेपासून (सुहूर) सूर्यास्तापर्यंत (इफ्तार) अन्न-पाण्याशिवाय उपवास करतात, जे आत्मसंयमन आणि अल्लाहप्रती भक्ती दर्शवते. हा महिना कुराण प्रगट झाल्याची आठवण म्हणून पाळला जातो आणि शेवटी 'ईद-उल-फित्र' साजरी केली जाते .
-उद्देश : आत्मशुद्धी, संयम, सहिष्णुता आणि गरजूंना मदत करणे.
-रोजा (उपवास): पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न आणि पाणी न घेणे.
-सेहरी आणि इफ्तार: पहाटेच्या जेवणाला 'सेहरी' आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडण्याच्या जेवणाला 'इफ्तार' म्हणतात.
-कुराण पठण : या महिन्यात कुराणचे जास्त पठण केले जाते.
-दान (जकात): या महिन्यात गरिबांना दान करणे आणि मदत करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
-ईद-उल-फित्र: महिनाभराच्या उपवासानंतर, चंद्र पाहून ईद-उल-फित्र साजरी केली जाते, जी आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

