फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्री येथे  भाजप कार्यकर्त्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. येथे माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पण या सत्कार सोहळ्यात नेते मंडळींसमोर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, आरोप-प्रत्यारोप व घोषणाबाजीचे दर्शन घडले. अखेर दानवेंसह इतर नेत्यांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले. परंतु या प्रकाराने सत्कार सोहळ्याला वादाचे गालबोट लागल्याचे दिसून आले.

फुलंब्रीमध्ये शनिवारी दुपारी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी लाडसावंगी आणि पाल गटातील पराभवाच्या कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन मोठा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत लाडसावंगी आणि पाल गटात भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.  काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवारांचे काम न करता विरोधकांना छुपी मदत केल्यानेच हा पराभव झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. विशेष म्हणजे सत्कार सोहळ्याच्यावेळी लाडसावंगी गटातील पराभवास जबाबदार असलेले पदाधिकारी नेत्यांच्या मांडीला मांडी लावून व्यासपीठावर बसलेले पाहताच कार्यकर्त्यांचा संयम सुटला. 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सन्मानाने व्यासपीठावर का बसवले?' असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी संबंधितांना खाली उतरवण्याची मागणी केली. यावरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सभागृहातच धक्काबुक्की आणि शाब्दिक युद्ध सुरू झाले.

रावसाहेब दानवेंनी केली वादात मध्यस्ती
वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पाहून माजी खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार अनुराधा चव्हाण यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. दानवे यांनी कार्यकर्त्यांना शांत करत, ‘पक्ष संघटना ही व्यक्तीपेक्षा मोठी आहे, आपले मतभेद घरामध्येच मिटवा', असे आवाहन केले, तसेच पराभवाचे आत्मचिंतन करून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या. नेत्यांच्या मध्यस्थीनंतर गोंधळ थांबला असला, तरी कार्यकर्त्यांमधील धुसफूस कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software