४ मुलांचे गिफ्ट पदरात टाकून पतीचे दुसरे लग्‍न!; ३० वर्षीय विवाहितेची पाचोड पोलिसांत धाव

On

पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन मुली, दोन मुलांचे गिफ्‍ट पहिल्या पत्‍नीच्या पदरात टाकल्यानंतर दुसरे लग्‍न करणाऱ्या पतीविरुद्ध पाचोड पोलिसांनी शनिवारी (१२ जुलै) गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री विकास माळी (वय ३०, रा. चौढाळा ता. पैठण, ह. मु. दावरवाडी ता. पैठण) या विवाहितेने याप्रकरणात तक्रार दिली आहे. विकास उत्तम माळी (रा. चौढाळा) असे पतीचे […]

पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन मुली, दोन मुलांचे गिफ्‍ट पहिल्या पत्‍नीच्या पदरात टाकल्यानंतर दुसरे लग्‍न करणाऱ्या पतीविरुद्ध पाचोड पोलिसांनी शनिवारी (१२ जुलै) गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री विकास माळी (वय ३०, रा. चौढाळा ता. पैठण, ह. मु. दावरवाडी ता. पैठण) या विवाहितेने याप्रकरणात तक्रार दिली आहे. विकास उत्तम माळी (रा. चौढाळा) असे पतीचे नाव आहे.

तक्रारीत भाग्‍यश्रीने म्‍हटले आहे, की ती सध्या आई, वडिलांकडे मुलाबाळांसह माहेरी राहते. तिचे ८ जुलै २०१४ रोजी विकाससोबत लग्न झाले होते. तिला पतीपासून २ मुली, २ मुले झाली आहेत. सासरच्या लोकांनी तिला १ जुलै २०१८ पर्यंत चांगले नांदवले. त्यानंतर पती विकास, सासरे उत्तम माळी (सासरा), सासू सुनिता यांनी छोट्या छोट्या कारणावरून भांडण सुरू केले. लग्नाच्या खर्चासाठी लागलेले दोन लाख रुपये तुझ्या माहेराहून घेऊन ये, असे म्हणून तिला शिवीगाळ व मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ करू लागले. ५ मार्च २०२५ रोजी भाग्‍यश्रीला पतीने मारहाण केली. त्‍यामुळे तिने पाचोड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली होती. नंतर आईकडे चारही मुलांसह राहण्यास आली.

त्यानंतर तिला पतीने दुसरे लग्न केल्याचे समजले. तेव्हा तिने सासरी चौढाळा येथे येऊन पतीला जाब विचारला, की ४ अपत्‍ये असूनही तुम्ही दुसरे लग्न का केले. त्यावर पतीने शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन घराबाहेर हाकलून दिले. तेव्हाही तिने २ जूनला पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ११ जून २०२५ रोजी तिने महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली. मात्र समझोता झाला नाही. त्‍यामुळे त्‍यांनी गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले. त्‍या पत्रावरून तिने पुन्हा पाचोड पोलीस ठाण्यात पती विकास, सासरा उत्तम, सासू सुनिता माळी (सर्व रा. चौढाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गणेश बोरकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software