छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्‍टोबरपासून आज, ९ नोव्‍हेंबरपर्यंत एकूण ८ अनोळखी मृतदेह पोलिसांना मिळून आले. कालच शनिवारी (८ नोव्‍हेंबर) वाळूज एमआयडीसीतून एक अनोळखी मृतदेह पोलिसांनी घाटी रुग्णालयात आणला होता.

याशिवाय ४ नोव्‍हेंबला २ मृतदेह घाटीत बेगमपुरा पोलिसांनी आणले होते. जे घाटीच्या आसपासच मिळाले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी महिनाभरात ३ मृतदेह घाटीत आणले. ज्यांची ओळख पटू शकली नाही. एक शनिवारी आणि अन्य दोन २८ ऑक्‍टोबरला आणले होते. याशिवाय वेदांतनगर आणि सिडको पोलिसांनीही प्रत्येकी १ मृतदेह अनोळखी म्हणून घाटीत आणला. चिकलठाणा पोलिसांनीही एक मृतदेह २९ ऑक्‍टोबरला घाटीत आणला होता. यातील ६ मृत्यू अनैसर्गिकरित्या झाल्याने तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हे मृतदेह कुणाचे आहेत, कशामुळे मृत्यू झाला, हे त्यांना शोधावे लागणार आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा २३ ऑक्‍टोबरला एक अनोळखी मृतदेह गंगापूर पोलिसांनी आणला होता.  गेल्या सप्टेंबरमध्येही शहरात ६ आणि ग्रामीण भागात २ असे ८ मृतदेह जिल्ह्यात आढळले होते. ऑगस्ट शहरात ६ आणि ग्रामीण भागात ४ असे १० अनोळखी मृतदेह आढळले होते. 

अनोळखी मृतदेह आढळल्यास काय असते प्रक्रिया...
पोलीस ओळख पटवण्यासाठी चेहरा, कपडे, दागिने, टॅटू, दस्तऐवज तपासणी करतात. यात मृताच्या अंगावर असलेले कपडे, दागिने, ओळखपत्र, मोबाइल, कागदपत्रे तपासली जातात. परिसरातील रहिवासी, दुकानदार, सीसीटीव्ही फुटेज पाहून ओळख करण्याचा प्रयत्न केला जातो. फोटो सार्वजनिक केला जातो. बोटांचे ठसे काढून पोलीस डेटाबेसशी जुळवतात. ओळख न पटल्यास DNA, दातांची रचना (Dental Records) यांचा उपयोग केला जातो. मृतदेहाला सरकारी रुग्णालयात आणले जाते. पोस्टमॉर्टेमची नोंद होते. मृत्यूचा प्रकार तपासला जातो.  जर मृत्यू संशयास्पद असेल तर गुन्हा दाखल केला जातो. खुनाच्या संशयावरून खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या आधारावर पोलीस इतर जिल्ह्यांना किंवा राज्यांना माहिती पाठवतात. साधारणतः मृतदेह हॉस्पिटलच्या मॉर्चरीमध्ये काही दिवस ठेवला जातो, जेणेकरून नातेवाईकांना ओळख पटवता येईल. ठराविक कालावधीत कोणीही पुढे न आल्यास सरकारी खर्चाने अंतिम संस्कार केला जातो. फोटो, बोटांचे ठसे व डीएनए नमुने भविष्यासाठी जतन ठेवले जातात.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!

Latest News

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक! कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या...
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार... 
सराफा व्यापाऱ्यावर ४ टवाळखोरांचा प्राणघातक हल्ला, दारू पिण्यासाठी पैसे मागत लाकडी दांड्याचे वार, व्यापारी जखमी, हडको एन ११ मधील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software