अल्पवयीन लेकीला अमानुष वागणूक, उपाशी ठेवायचे, चटके द्यायचे, बेदम मारहाण करायचे, बाथरूममध्ये राहायला लावायचे…वाळूज MIDC तील अंगावर शहारे आणणारी छळकहानी!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन न्यूजडेस्क) : लेकीला अमानुष वागणूक देत अनन्वीत छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून तिच्या आई-वडिलांविरुद्ध आज, १४ जुलैला गुन्हा दाखल केला आहे. बाथरूम, गच्‍चीवर राहायला लावण्यापासून तर बेदम मारहाण करणे, उपाशी ठेवणे, चटके देणे असे प्रकार या मुलीसोबत सुरू होते. १७ वर्षीय कीर्ती […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन न्यूजडेस्क) : लेकीला अमानुष वागणूक देत अनन्वीत छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून तिच्या आई-वडिलांविरुद्ध आज, १४ जुलैला गुन्हा दाखल केला आहे. बाथरूम, गच्‍चीवर राहायला लावण्यापासून तर बेदम मारहाण करणे, उपाशी ठेवणे, चटके देणे असे प्रकार या मुलीसोबत सुरू होते.

१७ वर्षीय कीर्ती (नाव बदलले आहे) मुलीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती वाळूज एमआयडीसीच्या कमळापुरातील समर्थनगरात राहत होती. सध्या तिला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार, सिडको महानगरातील सावली बालगृहात ठेवण्यात आले आहे. तिचे आई-वडील मूळचे राजस्थानचे असून, अनेक वर्षांपासून कमळापूरमध्ये राहतात. तिचे वडील बजाज कंपनीत काम करतात. आई घरकाम करते. कीर्तीला दोन मोठ्या बहिणी व दोन लहान भाऊ आहेत. कीर्ती तिसरी मुलगी असल्यामुळे लहानपणापासूनच आजी-आजोबाकडे राजस्थानला राहत होती. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले. तिचे आजोबा वृद्धापकाळाने वारले त्यावेळी तिची आठवीची परीक्षा चालू होती. १ जानेवारी २०२० रोजी लॉकडाऊन लागल्याने ती आई- वडिलांकडे राहायला छत्रपती संभाजीनगरला आली. लॉकडाऊनमुळे दोन वर्षे इथेच राहिली.

छत्रपती संभाजीनगर येथे राहत असताना तिची आई घरातील कामे करायला सांगायची. चपाती निट झाली नाहीतर हाताला चिमट्याने चटके द्यायची. तिला जेवायला देत नव्हती. आई- वडील दोघेही तिला मारहाण करत होते. भाऊ- बहीण तिला बोलत नव्हते. तिची आई म्हणायची, की तू सावत्र आजीकडे इतके दिवस राहिली तर लग्नासाठी ज्वेलरी घेऊन ये. त्यावेळी कीर्ती त्यांना म्हणायची, की मी आजीकडून काही आणणार नाही. त्यावर तिची आई तिला बाथरूममध्ये, गच्चीवर रहायला लावायची. घरातून बाहेर निघू देत नव्हते. तिला नवीन कपडे खरेदी करून देत नव्हते. आजीकडून आणलेले कपडेच ती घालत होते. आई तिला खूप मारायची. एकेदिवशी तिच्या वडिलांनी दामिनी पथकाला फोन करून बोलावले. तिला समजावून सांगितले. मात्र तिला आई -वडिलांकडे रहायचे नव्हते. त्यामुळे बाल कल्याण समितीपुढे हजर केले. तिला ९ जानेवारी २०२४ पासून विद्यादीप बालगृहात ठेवण्यात आले. आई-वडिलांकडे राहत असताना त्यांनी वेळोवेळी हाताचापटांनी मारहाण केली. चपाती निट येत नाही म्हणून हाताला आईने चटके दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software