मोठी विमाने उतरण्यासाठी चिकलठाणा विमानतळाचा विस्तार होणार, भूसंपादनासाठी मालमत्तांचे मूल्यांकन सुरू होणार!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू आहे. धावपट्टी वाढविण्यासाठी १४७ एकर जमीन लागणार आहे. भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ६६ कोटी ७८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ५८ हेक्टरची भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आल्यानंतर सूचना-हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली. आता मालमत्तांचे मूल्यांकन आठ- दहा दिवसांत करण्यात येणार आहेत. सध्या विमानतळाची धावपट्टी ९ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू आहे. धावपट्टी वाढविण्यासाठी १४७ एकर जमीन लागणार आहे. भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ६६ कोटी ७८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ५८ हेक्टरची भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आल्यानंतर सूचना-हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली. आता मालमत्तांचे मूल्यांकन आठ- दहा दिवसांत करण्यात येणार आहेत.

सध्या विमानतळाची धावपट्टी ९ हजार ३०० फूट असून, मोठ्या विमानांसाठी धावपट्टीची लांबी किमान १२ हजार फूट असणे गरजेची आहे. चिकलठाणा, मुर्तुजापूर, मुकुंदवाडी या गावांतील मालमत्तांचे संपादन करण्यात येत आहे. भूसंपादनासाठी १५२ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सांगितले, की भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचनेवर आलेल्या आक्षेपांवरील निर्णय महिनाभरात घेतले जातील. भूसंपादन करताना काही नागरिकांच्या मालमत्ताही बाधित होणार असून, यात पक्की- कच्ची घरांचा समावेश आहे. झाडे, विहिरीसुद्धा आहेत. या सर्व मालमत्तांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात येणार आहे. मूल्यांकनासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. त्यामुळे महसूल विभागाने तलाठी, मंडळाधिकाऱ्यांचे पथक या कामासाठी नियुक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software