ओल्या दुष्काळाची तरतूद नाही, तर सत्तेत नसताना कशाला ओला दुष्काळ जाहीर करा म्हणत होतात?, रोहित पवार यांचा छ. संभाजीनगरमध्ये फडणवीस यांना सवाल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सत्तेत नसताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत होते, आता तेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची तरतूद नाही, असे बोलत आहेत. आतापर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर केला गेला नव्हता, कारण एवढा पाऊसही झाला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भान ठेवून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (१ ऑक्टोबर) यांनी छत्रपती संभाजीनगरात केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे १०० टक्‍के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी सरकारकडे आ. पवार यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन केली. या वेळी जिल्ह्यातील पदाधिकारी पांडुरंग तायडे पाटील, ख्वाजा शरफोद्दीन, आशिष पवार, संजय वाघचौरे, अशोक खोसरे उपस्थित होते. पिकांच्या नुकसानीसोबतच विहिरींची पडझड झाली आहे. विद्युत पंप, शेती अवजारेही वाहून गेली आहेत. शेकडो जनावरे दगावली आहेत. नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, गुजरात, पंजाब राज्याप्रमाणे महाराष्ट्रालादेखील निधी द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन पाहणी करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

जिल्ह्यात अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असून, एकेका तलाठ्याकडे ३-३ गावे असल्याने वेळ लागतो. पण, कुणालाही वगळले जाणार नाही. जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षता घेतली. अगोदरच सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पडळकरांना फडणवीस सांगत असावेत...
आमदार जयंत पाटील यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर करत असलेल्या टीकेबद्दल रोहित पवार म्हणाले, की पडळकर हे फडणवीस यांचे ऐकत नसतील तर फडणवीसच तसे बोलायला सांगतात का, असा प्रश्न निर्माण होतो. स्वतःची स्वच्छ प्रतिमा राखून इतरांवर खालच्या पातळीवर बोलण्यासाठी बहुजन नेत्यांचा उपयोग केला जात असल्याचा संशय पवार यांनी केला. फडणवीस यांनी पत्रकारांसमोर येऊन सांगावे, की पडळकर आमचे ऐकत नाहीत, असे पाटील

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software