मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या राजश्रीताई उंबरेंची प्रकृती खालावली

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या सहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राजश्रीताई उंबरे क्रांती चौकात उपोषणाला बसल्या आहेत. आज, ७ सप्‍टेंबरला त्‍यांची प्रकृती खालावली. त्‍यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी उपोषणस्थळी धावले. त्‍यांनी उपचार घेण्याची विनंती केली. त्‍यांची विनंती राजश्रीताईंनी मान्य करत पाणी पिले व सलाईन लावून घेतली, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या सहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राजश्रीताई उंबरे क्रांती चौकात उपोषणाला बसल्या आहेत. आज, ७ सप्‍टेंबरला त्‍यांची प्रकृती खालावली. त्‍यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी उपोषणस्थळी धावले. त्‍यांनी उपचार घेण्याची विनंती केली. त्‍यांची विनंती राजश्रीताईंनी मान्य करत पाणी पिले व सलाईन लावून घेतली, मात्र उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे.

२ सप्‍टेंबरपासून राजश्रीताईंचे उपोषण सुरू असून, मराठा समाजबांधवांचा त्‍यांच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून त्‍यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात समाजबांधव एकवटत आहेत. हजारोंच्या संख्येने समाजबांधव येत असल्याने क्रांती चौकात पोलीस बंदोबस्तही कालपासून वाढविण्यात आला आहे. आज त्‍यांची प्रकृती खालावल्याने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्‍तांनी येऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र राजश्रीताईंनी ती विनंती धुडकावून लावत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असा निर्धार व्यक्‍त केला.

त्‍यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी किमान उपचार तरी घ्या, थोडे पाणी तरी प्या, अशी विनंती केली. ती विनंती त्‍यांनी मान्य केली. मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा यासह २१ मागण्यांसाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्रीताई उंबरे यांनी उपोषणाला बसलेल्या आहेत. दरम्‍यान, घाटीच्या दोन तज्‍ज्ञ डॉक्‍टरांना राजश्रीताईंच्या प्रकृती काळजी घेण्यासाठी नियुक्‍त करण्यात आले आहेत. उपोषणस्थळी एक रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अंबादास दानवे यांनी घेतली भेट…
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन राजश्रीताई उंबरे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी उपोषण हा एक मार्ग असला तरीही दुसऱ्या मार्गाने आपण हा लढा जिंकू शकतो. समाजाच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असल्याने आपल्या जीवाची काळजी घेऊन आपल्याला हा लढा जिंकावा लागेल, अशी विनवणी करत आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. या वेळी शिवसेना शहर संघटक सचिन तायडे, बाळराजे आवारे, किशोर चव्हाण व हिमानी मोहोड उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software