- News
- जिल्हा न्यूज
- हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्...
हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नदीपात्रात पाणी सोडले. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे पाण्याच्या लोंढ्यात एका शेतकऱ्यासह गाय वाहून गेली. दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१७ मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. भानुदास गंगाधर मगर (वय ७२, रा. करंजगाव) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा मुलगा व दोन बैल सुदैवाने बचावले.
पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यापूर्वी दवंडी देणे आवश्यक होते. मात्र त्यात हलगर्जीपणा केल्याने शेतकऱ्याचा आणि गायीचा बळी गेला. दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मगर यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बोर दहेगाव मध्यम प्रकल्पाचे उप अभियंता पवन चव्हाण यांना कॉल केले असता त्यांचा फोन बंद होता.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
17 Mar 2026 16:25:20
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई...

