- Marathi News
- जिल्हा न्यूज
- पाऊस नसल्याने पीक पिवळे पडले, सिल्लोडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
पाऊस नसल्याने पीक पिवळे पडले, सिल्लोडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
On

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : बहुली (ता. सिल्लोड) येथे पाऊस नसल्याने मका पिक पिवळे पडले. त्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (१८ जुलै) संध्याकाळी सातला घडली. अजिंठा पोलिसांनी या घटनेची नोंद मंगळवारी (२२ जुलै) सायंकाळी घेतली.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथे १७ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२२ जुलै) दुपारी तीनला घडली. आकाश अंशीराम रामपिसे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आकाश आई-वडिलांसह कुंभेफळमध्ये राहत होता. आकाशने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याचा मोठा भाऊ संदेशने तातडीने त्याला फासावरून काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आकाशच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
25 Jul 2025 22:12:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्त्याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्डा...