धक्कादायक… अतिवृष्टीने सारेच हिरावले… २८ वर्षीय शेतकऱ्याची राहत्‍या घरी विष घेऊन आत्‍महत्‍या!, फुलंब्रीची घटना; आजाराने त्रस्त २० वर्षीय युवकाची पैठणमध्ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन तरुणांच्या आत्‍महत्‍येने खळबळ उडाली आहे. अतिवृष्टीने सारेच हिरावल्याने २८ वर्षीय शेतकऱ्याची राहत्‍या घरी विष घेऊन आत्‍महत्‍या केली, तर आजाराने ग्रस्त २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. फुलंब्री आणि पैठण तालुक्‍यातील या घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. आधीच कर्जबाजारीपणा, त्यात अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान यामुळे रविवारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन तरुणांच्या आत्‍महत्‍येने खळबळ उडाली आहे. अतिवृष्टीने सारेच हिरावल्याने २८ वर्षीय शेतकऱ्याची राहत्‍या घरी विष घेऊन आत्‍महत्‍या केली, तर आजाराने ग्रस्त २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. फुलंब्री आणि पैठण तालुक्‍यातील या घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे.

आधीच कर्जबाजारीपणा, त्यात अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान यामुळे रविवारी (१५ सप्‍टेंबर) रात्री फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील विजय प्रकाश साठे (वय २८) या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने विष घेऊन आत्‍महत्‍या केली. त्यांच्यावर खासगी कर्ज होते. ते कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. याच नैराश्यातून राहत्या घरी विष घेतले. नातेवाईकांनी धावपळ करून त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या पार्थिवावर गेवराई पायगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. वडोद बाजार पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

दुसऱ्या घटनेत आजाराने त्रस्त गणेश ज्ञानदेव खोमणे (वय २०, रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण) याने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेशचे गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी पैठण एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गणेशला पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software