छ. संभाजीनगरात महसूल सप्ताहाचा समारोप; स्वतःचे ज्ञान अद्ययावत करून लोकांना सेवा द्या : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दैनंदिन कार्यालयीन कामकाज,सेवा, कर्तव्य बजावताना आपण आपले ज्ञान अद्यावत करत राहणे आवश्यक आहे. अद्यावत ज्ञान केल्यास आपण लोकांना चांगली सेवा देऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. तर आपण चांगले काम करुन लोकांना सेवा द्यावी व आपल्या विभागाचे प्रतिमा संवर्धन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

महसूल सप्ताहाचा शुक्रवारी (८ ऑगस्ट) समारोप झाला. त्यानिमित्त एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोहळ्यास विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य प्रशासकीय अधिकारी सिडको जगदीश मिणीयार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड, संगिता सानप, एकनाथ बंगाळे, डॉ. अरुण जऱ्हाड, संतोष गोरड तसेच सर्व तहसिलदार, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी अनिल सुर्यवंशी, परेश खोसरे, देविदास जरारे, विद्याचरण कडवकर, स्वरुप कंकाळ आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी सांगितले की, सेवा काळात वाचन आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून आपण स्वतःचे ज्ञान अद्यावत करावे. बहुविध पद्धतीची कामगिरी आपणास करणे सहज शक्य होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, आपल्या विभागामुळे आपल्याला ओळख नाव मिळते. प्रतिष्ठा मिळते. ती प्रतिष्ठा लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देऊन आपण वाढविली पाहिजे. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, वाचन, आरोग्य विषयक जागरुकता राखणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की, शासनाने आता अनेक विषयात धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. कृत्रिम वाळू धोरण हे अशाच प्रकारचे धोरण आहे. लोकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करुन दिल्यास हा प्रश्न निकाली निघेल. जगाच्या प्रगतीबरोबर आपल्यालाही जुळवून घ्यावे लागेल. त्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्यावत ठेवावे. विभागाची प्रतिमा उंचवावी,असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक जनार्दन विधाते यांनी केले.यावेळी महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व महसूल कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लाज सोडलेल्या पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी निघाली फेक, संतप्त नागरिकांचे रस्त्यासाठी पुन्हा उपोषण सुरू!, रांजणगाव शेणपुंजीतील नक्की काय आहे प्रकरण...

Latest News

लाज सोडलेल्या पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी निघाली फेक, संतप्त नागरिकांचे रस्त्यासाठी पुन्हा उपोषण सुरू!, रांजणगाव शेणपुंजीतील नक्की काय आहे प्रकरण... लाज सोडलेल्या पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी निघाली फेक, संतप्त नागरिकांचे रस्त्यासाठी पुन्हा उपोषण सुरू!, रांजणगाव शेणपुंजीतील नक्की काय आहे प्रकरण...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रांजणगाव शेणपुंजीतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते ओमसाईनगरातील महादेव मंदिरापर्यंतच्या रस्‍त्‍याचा प्रश्न कायम आहे....
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे १० किंवा त्यापेक्षा जास्त महिला कर्मचारी, तिथे अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावीच लागणार!
छत्रपती संभाजीनगरची सर्व शासकीय कार्यालये नववर्षाचा करणार ‘हा’ संकल्प!, जिल्हाधिकारी म्हणाले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पहिल्यांदाच होणारा केंद्रीय लोककला महोत्सव!
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software