आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिक्रमण हटाव मोहिमेत महापालिकेच्या आततायी भूमिकेमुळे पोलिसांची गोची होताना दिसत आहे. अनेकदा मार्किंग नसते, न्यायालयात वाद चालू असतो, तरी लगेच बुलडोझर पुढे केला जातो. त्‍यामुळे कडाडून विरोध सुरू होतो. अशावेळी महापालिका पोलिसांना पुढे करते. या विरोधाला पोलिसांना सामोरे जावे लागते. त्‍यामुळे आता पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी सावध भूमिका घेतली असून, यापुढे थेट पाडापाडी करू नका. रीतसर नोटीस, मालमत्तांवर मार्किंग करावी. आक्षेप असल्यास शंकांचे निरसन करा. त्यानंतरच पाडापाडी सुरू करा, अशी स्पष्ट भूमिका पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतली आहे.

बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी पोलीस आयुक्तालयात शहरातील अतिक्रमण मोहीम व पीपीपी तत्त्वावरील डिजिटल पार्किंग प्रकल्पाबद्दल महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मार्गदर्शन केले. नागरी मित्र पथकाला कुठल्याच कारवाईचा अधिकार नसून, ते केवळ पोलिसांच्या सहकार्यासाठी आहेत, असे पोलीस आयुक्‍तांनी स्‍पष्ट केले. नारेगावमध्ये नागरी मित्र पथकाने एका तरुणाची कॉलर पकडून लाथा मारल्याबद्दल त्‍यांनी ही बाब स्‍पष्ट केली.

हर्सूलमध्ये पाडापाडीपूर्वी ७ दिवस आधी नोटीस देणार
नारेगावच्या नागरिकांनी २४ तासांचा वेळ मागूनही केवळ २ तास दिले असले तरी, हर्सूलमध्ये मात्र पाडापाडी करण्याआधी ७ दिवसांची नोटीस देण्यात येणार आहे. हर्सूलमधील नागरिकांनी आधी मोबदल्याची मागणी केली असून, त्‍याशिवाय पाडापाडीला कडाडून विरोध केला आहे. हर्सूलमधील ३०० मालमत्ता रस्ता रूंदीकरणात येत आहेत. अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले असून, २७ मालमत्ताधारकांना आता नोटीस बजावली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ७ दिवसांची नोटीस देण्याबद्दल मनपाचे अतिक्रमण हटाव विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले, की हर्सूल रस्त्यावरील काही मालमत्ताधारक न्यायालयात गेले होते. बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण केल्याचे तेथे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे त्यांना ७ दिवसांची नोटीस बजावण्यात येणार आहे, असे ते म्‍हणाले.

वास्तुविशारदांची मनमानी दर आकारणी
पाडापाडीमुळे बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेकडे येणाऱ्या अर्जांचा ओघ वाढला आहे.  याचा गैरफायदा वास्तुविशारद घेत असून, ते मालमत्ताधारकांची लूट करताना दिसत आहेत. त्‍यामुळे महापालिकेने दर निश्चित करून देण्याची मागणी केली जात आहे. कुणी १५ हजार, तर कुणी २५ हजार रुपये शुल्क घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्‍यावर महापालिकेचे आयुक्‍त जी. श्रीकांत म्‍हणाले, की गुंठेवारी शुल्कावर टक्केवारी ठरवून वास्तुविशारदांना पैसे दिले जाणार आहेत. लवकरच हे दर जाहीर केले जातील.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे समस्‍येकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय... 

Latest News

महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे समस्‍येकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय...  महापालिका-पोलीस प्रशासनाची गट्टी जमली!; पाडापाडीनंतर आता पार्किंगकडे समस्‍येकडे लक्ष वेधले!!; घेतला ‘हा’ मोठा निर्णय... 
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील पार्किंगची समस्या आता सुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट...
ठाकरे गटाच्या महिला सरपंच असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव?, मावसाळाच्या राजेश्री देवगिरीकर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ
कर्मचारी महिलांना घरी बोलावून मालिश करून घेतली; ‘सामाजिक कल्याण’च्या  तत्‍कालिन उपायुक्‍तांविरुद्ध गुन्हा दाखल
आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते...
वैजापूरच्या अंचलगावचा लाचखोर तलाठी गोविंद सबनवाड २ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला!, छ. संभाजीनगरच्या पडेगावमध्ये राहतो
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software