सुसाट हायवा, ट्रक बनले यमदूत!; छत्रपती संभाजीनगरात दोघांना चिरडले!!; आंबेडकरी नेते अशोक जाधव यांचा मृतकांत समावेश

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर, परिसरात हायवा, ट्रक सुसाट धावत आहेत. वेगावर नियंत्रण नसल्याने ते यमदूत बनले असून, कधी कुणाला चिरडतील काहीच भरवसा नाही. छत्रपती संभाजीनगरात सोमवारी (१६ सप्टेंबर) वडिलांना दवाखान्यात घेऊन येणाऱ्या युवकाला सुसाट हायवाने ७० ते ८० फूट चिरडत नेले, तर आंबेडकरी नेते अशोक जाधव यांना भरधाव ट्रकने धडक देत पोबारा केला. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर, परिसरात हायवा, ट्रक सुसाट धावत आहेत. वेगावर नियंत्रण नसल्याने ते यमदूत बनले असून, कधी कुणाला चिरडतील काहीच भरवसा नाही. छत्रपती संभाजीनगरात सोमवारी (१६ सप्टेंबर) वडिलांना दवाखान्यात घेऊन येणाऱ्या युवकाला सुसाट हायवाने ७० ते ८० फूट चिरडत नेले, तर आंबेडकरी नेते अशोक जाधव यांना भरधाव ट्रकने धडक देत पोबारा केला.

वडिलांना दवाखान्यात आणताना हायवाने चिरडले…
भरधाव हायवाने युवकाला चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झाल्टा फाट्याजवळ घडली. सचिन भागवत पानखडे (वय ३१, रा. राजपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून, तो वडिलांना दवाखान्यात घेऊन येत होता. सचिनचे वडील आजारी असल्याने त्यांना घेऊन सचिन कारने छत्रपती संभाजीनगरला येत होता. सोबत भाऊ रामेश्वर आणि प्रल्हाद होते. झाल्टा फाटा येथे ते लघुशंकेसाठी थांबले. सचिन लघुशंका करून झुडुपातून रस्त्यावर आला अन् त्याचवेळी निपाणीकडून शहराकडे भरधाव निघालेल्या हायवाने (क्र. एमएच २० जीसी ५५०९ ) त्याला धडक दिली.

हायवाचा वेग इतका होता, की जवळपास ७० ते ८० फूट फरपटत नेले. कारमध्ये बसलेल्या आई-वडिलांदेखत तो चिरडला गेला. यात सचिन जागीच मृत्यूमुखी पडला. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हायवा चालकाला अटक करण्यात आली आहे. सचिनचे लग्न वर्षभरापूर्वीच झाले होते. तो शेती करत होता. वडिलांची प्रकृती काही दिवसांपासून खराब होती. स्थानिक रुग्णालयांत उपचाराने बरे वाटत नसल्याने तिन्ही भाऊ त्यांना छत्रपती संभाजीनगरला घेऊन येत होते.

भरधाव ट्रकने अशोक जाधव यांना चिरडले…
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांतीनगरात राहणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक गोविंद जाधव (५८) यांना सोमवारी दुपारी खुलताबाद-कसाबखेडा रस्त्यावर भरधाव ट्रकने चिरडले. ते कामानिमित्त खुलताबादला गेले होते. तेथे भाजी खरेदी करून दुचाकीने घराकडे येत असताना कसाबखेडा रस्त्यावर त्यांची भाजीची पिशवी निसटून पडली. ती घेण्यासाठी ते वाकले असता मागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक देऊन पोबारा केला. स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software