खडी रोडवर प्रशासन, कंत्राटदाराकडून ‘यमदेवाची स्थापना’; बळी गेल्याशिवाय काम न करण्याचा पवित्रा?

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवळाई परिसरातील खडी रोडवर महापालिका, लोकप्रतिनिधी, कंत्राटदाराने मिळून यमदेवाची स्थापना केली आहे. बळी जाण्यासाठी खड्डे तयार ठेवले असून, त्‍यात बळी गेल्याशिवाय रस्‍त्‍याचे काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. शुक्रवारी (२८ जून) दुचाकीस्वार वाहनासकट पडून जखमी झाल्यानंतर नागरिकांचा आक्रोश वाढला आहे. नागरिकांनी ६ जुलैला […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवळाई परिसरातील खडी रोडवर महापालिका, लोकप्रतिनिधी, कंत्राटदाराने मिळून यमदेवाची स्थापना केली आहे. बळी जाण्यासाठी खड्डे तयार ठेवले असून, त्‍यात बळी गेल्याशिवाय रस्‍त्‍याचे काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. शुक्रवारी (२८ जून) दुचाकीस्वार वाहनासकट पडून जखमी झाल्यानंतर नागरिकांचा आक्रोश वाढला आहे. नागरिकांनी ६ जुलैला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने वातावरण पेटले आहे.

रस्‍त्‍याच्या बिकट अवस्थेमुळे नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. लोकांच्या समस्यांसाठी एरवी तत्‍पर राहणारे आ. संजय शिरसाट यांना आमच्यावरील एवढे मोठे संकट का दिसत नाही, असा प्रश्न नागरिक करताना दिसत आहेत. दुचाकीस्वार खड्ड्यात पडल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी बाहेर काढले. त्‍यानंतर रस्त्याची अवस्था सुधारावी, अर्धवट काम पूर्ण करावे आणि रस्ता मोकळा करावा, अशी मागणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली. देवळाई येथील खडी रोड सध्या चिखलाने माखला आहे. वाहने चालवणे तर दूर, पायी चालणेही अवघड झाले आहे. १९ मे रोजीही सकाळी नागरिकांनी आंदोलन केले होते. १५ जूनला नागरिकांनी उंटावर बसून आंदोलन केले होते. मात्र समस्या जैसे थे आहे.

सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश होऊनही भाग मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे. दरवर्षी २० कोटींपेक्षा अधिक कर या भागातून भरला जातो. देवळाई रस्त्याला समांतर रस्ता म्हणून खडी रोड ओळखला जातो. काळ्या मातीचा हा खडी रोड ६० फुटांचा व २ किलोमीटर अंतराचा आहे. तो देवळाईला जोडतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती झाल्या असून, गृहनिर्माण सहकारी संस्था, व्यापारी संकुल, दुकाने, शाळा असल्याने २४ तास वर्दळ असते. रस्ता प्रश्नी ठाकरे गट आक्रमक असल्याने मंत्री शिरसाट दुर्लक्ष करत आहेत का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याचे भूमिपूजन झाले होते. ४ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे काम देवळाईतीलच प्रसिद्ध ठेकेदाराला देण्यात आले. या ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला. त्यानंतर काम काही केलेच नाही. त्यामुळे खड्डे अन्‌ चिखलातून येजा करणे अवघड झाले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software