मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते. शहर पाणी योजनेची काय चालढकल सुरू आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यात आता याही उन्हाळ्यात पाणीटंचाई चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. जलकुंभांवरून विविध वसाहतींकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर १ हजारांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असून, ते खंडित करण्याची कारवाई आता सुरू केली जाणार आहे. या कारवाईमुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे.

१२००, ९०० आणि ७०० मि. मी. व्यासाच्या तीन जलवाहिन्यांद्वारे शहरात सध्या १४० एमएलडी पाणी येत असून, रोजची शहराची गरज २१० एमएलडी इतकी आहे. त्यामुळे ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवत असतो. शहर पाणी योजनेचे अद्याप काहीच खरे नसल्याने आहे त्या त्या पाण्यात नियोजन कसे करता येईल, यावर सध्या महापालिका भर देत असल्याचे दिसून येते. सध्या काही वसाहतींना आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. हा गॅप कमी करण्याचे निर्देश महापौर, उपमहापौरांनी दिले आहेत. त्यादृष्टीने पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप तरी त्यांना यश आलेले नाही.

शहरातील अनेक भागांत जलवाहिन्यांना गळती व पाणी चोरी होत असल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत असतो. आता कोणत्या जलवाहिन्यांवर किती अनधिकृत नळ आहेत, याची पाहणी रोबोटद्वारे केली जात आहे. अवैध नळ कनेक्शन तपासण्यासाठी मनपाने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. लवकरच अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्युबिली पार्क, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सिल्कमिल कॉलनी, रेल्वेस्टेशन, जयभवानीनगर, संजयनगर, रोशनगेट, कटकटगेट, बुढीलेन या भागात जलकुंभातून वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरच अवैध नळकनेक्शन मोठ्या प्रमाणावर आहेत. १५ मुख्य जलवाहिन्यांचे हे बिकट चित्र आहे. आता या मोहिमेला मुहूर्त कधी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘पाटबंधारे’ने दिली शहराचे पाणी तोडण्याची धमकी
पैठण येथील जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभाग महापालिकेकडून दरमहा बिल वसूल करतो. मात्र, महापालिकेने बिल वेळेत न भरल्याने तब्बल ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे आता जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनीही महापालिकेला नोटीस बजावून १५ मार्चपर्यंत एकरकमी ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपये भरा अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या नोटिसीला देऊन दोन दिवस उलटून गेले तरी, महापालिकेकडून काय पाणीपट्टी भरण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software