छत्रपती संभाजीनगरसह १२ जिल्हा परिषदांची ५ फेब्रुवारीला निवडणूक, ७ फेब्रुवारीला मतमोजणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात अखेर बहुप्रतिक्षीत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक ५ फेब्रुवारीला घेण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. ७ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावण्यास अवघे दीड तास बाकी असताना, ग्रामीण भागात रणधुमाळीला सुरुवात झाली असून, आचारसंहिता लागली आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचाही समावेश आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत घेण्यात येईल. मजमोजणी ७ फेब्रुवारीला सकाळी १० पासून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी वापरली जाणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम...
१६ जानेवारी ते २१ जानेवारी  : उमेदवारी अर्ज दाखल करता येणार.
२२ जानेवारी : उमेदवारी अर्जांची छानणी
२७ जानेवारी : उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
२७ जानेवारी दुपारी साडेतीननंतर : अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप

१२ जिल्हा परिषदेत एकूण ७३१ सदस्य निवडून येतील. त्यापैकी ३६९ जागा महिलांसाठी, ८३ जागा अनुसूचित जाती, २५ जागा अनुसूचित जमाती व १९१ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. १२५ पंचायत समितींमध्ये एकूण १४६२ सदस्य निवडून येतील. त्यापैकी ७३१ जागा महिलांसाठी, १६६ जागा अनुसूचित जाती, ३८ जागा अनुसूचित जमाती व ३४२ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकूण मतदान केंद्र २५, ४८२ असणार आहेत. जिल्हा परिषदांच्या या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मत देणे बंधनकारक आहे. त्यातील एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समिती गणासाठी द्यावे लागेल. या निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रतिक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.



आणखी महत्त्वाच्या बातम्या

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!

Latest News

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या! वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत लॉजवर गेल्यानंतर तिने ब्लॅकमेल सुरू केल्याने ५१ वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीतच...
कन्नड हादरले : वंदनाने गुप्तांग दाबून मारले, धीरजने डोक्यात घातले शस्‍त्राचे वार, माजी सरपंचपूत्राच्या हत्‍येचे गूढ उकलले!!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी ‘व्हॉइस ऑफ फ्युचर’ सेमिनार!, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजकांची नोंदणी सुरू...
बिडकीनजवळील जुगार अड्ड्यावर छापा, ‘या’ ७ जणांना पकडले!‌
१६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले, छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software