म्हणून मंत्री सावेंकडून मुख्यमंत्र्यांनी उधार घेतले २० रुपये, म्हणाले... कमळ बेदाम...चिखलात राहूनही... ; क्रांती चौकात कमल तलावाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत करून महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. हे योगदान अमुल्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

585090617_1172300081667686_39641 (1)

छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण करून लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी आज, १६ नोव्‍हेंबरला केले. याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ऐतिहासिक कमल तलावाचेही लोकार्पणही त्यांनी केले. या वेळी मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते. महानगरपालिकेने कमल तलावाच्या पुनर्जीवनाचे काम केल्याबद्दल महापालिका आयुक्त जी. श्रीकांत  आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवीन ठिकाण कमल तलाव म्हणून पाहण्यास उपलब्ध झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडिलगेकर यांचा या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

स्वतः तिकिटाची खरेदी, २० रुपये घेतले सावेंकडून...
कमल तलावाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: तिकिटाची खरेदी करून कमल तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, की कमळाच्या ठिकाणी कितीही चिखल, दलदल असो पण कमल फुल ते कधीही एक छिटाही अंगावर येऊ देत नाही. कमळावर कुठलाही दाग लागत नाही. अशा या कमल फुलाच्या तलावाचे येथे पुनरुज्जीवन केलेले असून, त्याचे पहिले तिकीट आपण स्वतः २० रुपये उधार घेऊन खरेदी केले आहे. हे २० रुपये आपले मंत्रिमंडळातील सहकारी अतुल सावे यांच्याकडून उधार घेतलेले असून, आज आपण कमल तलाव पाहायला जाऊ शकलो नाही तरी आपली मनपा आयुक्तांना विशेष विनंती असेल की, जेव्हा पुन्हा कधी शहरात येऊ त्यावेळी जुने तिकिट अधिकृत समजून आपणास तलाव बघण्यासाठी प्रवेश द्यावा, असे फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. अतुलजी तुमच्याकडून २० रुपये उधार घेतले आहेत, पण पुढच्या काळात परत करेन, असा विश्वास देतो. तोपर्यंत तिकीट ठेवून देतो, असे फडणवीस म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software