आधी नगरपालिका, मग उडणार जि. प., पं. स. निवडणुकीचा बार!; निवडणूक आयोगाने मागवले जिल्हाधिकाऱ्यांचे मत

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप निवडणूक आयोगाने घोषित केलेला नसला तरी आधी नगरपालिकांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बार उडेल, असे संकेत मिळत आहेत. राज्य निवडणूक आयोगानेही तशीच तयारी करीत जिल्हाधिकाऱ्यांकडून मते मागविली असल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी जाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्या अनुषंगाने तत्काळ पावले उचलण्यास प्रारंभ केला. असे असले तरी राज्य निवडणूक आयोगाने अद्याप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला नाही. मात्र, राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिकांच्या निवडणुका आधी होतील, असे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नगरपालिका निवडणुकांसाठी आधी तयारी करून ठेवावी, अशा सूचना त्यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते. 

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपालिकेची निवडणूक घ्यावी की जिल्हा परिषदेची या दृष्टीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून मते मागविली आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी आणि महापूर यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेली आर्थिक मदत अद्याप या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. ही मदत पोहोचविण्यासाठी थोडा कालावधी मिळावा, या दृष्टीने राज्यातील सत्ताधारी महायुतीचे नेते आधी नगरपालिकेची निवडणूक घेऊन नंतर जि. प. व पं. स. निवडणुकीला सामोरे जाण्याच्या मताचे आहेत.

जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणखी किमान २० दिवस लागतील, असा महायुतीच्या नेत्यांचा होरा असून, आधी नगरपालिकेची निवडणूक झाल्यास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या मदतीला आचारसंहितेचा अडथळा होणार नाही, असे या नेत्यांना वाटते. शिवाय आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाल्यास आणि त्याआधी मदत न पोहोचल्यास त्याचा फटका बसू शकेल, अशी भीतीही महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच महायुतीचे प्रमुख नेते आधी नगरपालिका निवडणूक घेण्याच्या बाजूने असल्याचे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेते बोलून दाखवत आहेत. 

निकालाचाही घोळ
प्रचलित पद्धतीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर दोन दिवसांनी त्याचे निकाल घोषित केले जातात. यावेळी मात्र आधी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि प्रचलित पद्धतीनुसार दोन दिवसांनी त्याचा निकाल घोषित केला तर त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या  निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोग आधी नगरपालिका निवडणूक घेतली तरी त्याचा निकाल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतरच घोषित करेल, असा अंदाजही सूत्रांनी वर्तविला आहे. 

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आधी नगरपालिकेच्या निवडणुका होणार की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या, याचा निर्णय घोषित होण्यासाठी मतदारांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल. त्या पाठोपाठ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software