आधी नगरपालिका, मग उडणार जि. प., पं. स. निवडणुकीचा बार!; निवडणूक आयोगाने मागवले जिल्हाधिकाऱ्यांचे मत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप निवडणूक आयोगाने घोषित केलेला नसला तरी आधी नगरपालिकांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बार उडेल, असे संकेत मिळत आहेत. राज्य निवडणूक आयोगानेही तशीच तयारी करीत जिल्हाधिकाऱ्यांकडून मते मागविली असल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी जाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्या अनुषंगाने तत्काळ पावले उचलण्यास प्रारंभ केला. असे असले तरी राज्य निवडणूक आयोगाने अद्याप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला नाही. मात्र, राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिकांच्या निवडणुका आधी होतील, असे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नगरपालिका निवडणुकांसाठी आधी तयारी करून ठेवावी, अशा सूचना त्यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते. 

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपालिकेची निवडणूक घ्यावी की जिल्हा परिषदेची या दृष्टीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून मते मागविली आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी आणि महापूर यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेली आर्थिक मदत अद्याप या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. ही मदत पोहोचविण्यासाठी थोडा कालावधी मिळावा, या दृष्टीने राज्यातील सत्ताधारी महायुतीचे नेते आधी नगरपालिकेची निवडणूक घेऊन नंतर जि. प. व पं. स. निवडणुकीला सामोरे जाण्याच्या मताचे आहेत.

जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणखी किमान २० दिवस लागतील, असा महायुतीच्या नेत्यांचा होरा असून, आधी नगरपालिकेची निवडणूक झाल्यास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या मदतीला आचारसंहितेचा अडथळा होणार नाही, असे या नेत्यांना वाटते. शिवाय आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाल्यास आणि त्याआधी मदत न पोहोचल्यास त्याचा फटका बसू शकेल, अशी भीतीही महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच महायुतीचे प्रमुख नेते आधी नगरपालिका निवडणूक घेण्याच्या बाजूने असल्याचे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेते बोलून दाखवत आहेत. 

निकालाचाही घोळ
प्रचलित पद्धतीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर दोन दिवसांनी त्याचे निकाल घोषित केले जातात. यावेळी मात्र आधी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि प्रचलित पद्धतीनुसार दोन दिवसांनी त्याचा निकाल घोषित केला तर त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या  निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोग आधी नगरपालिका निवडणूक घेतली तरी त्याचा निकाल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतरच घोषित करेल, असा अंदाजही सूत्रांनी वर्तविला आहे. 

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आधी नगरपालिकेच्या निवडणुका होणार की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या, याचा निर्णय घोषित होण्यासाठी मतदारांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल. त्या पाठोपाठ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software