- News
- पॉलिटिक्स
- जिल्हा परिषद निवडणुकीत युतीसाठी भाजप-शिंदे गटात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू, रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाल...
जिल्हा परिषद निवडणुकीत युतीसाठी भाजप-शिंदे गटात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू, रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही... बंडखोरांना थोपविण्यासाठी पुन्हा ‘मनपा पॅटर्न’?, ठाकरे गटाची काँग्रेस-‘वंचित’सोबत बोलणी सुरू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने शिंदे गटासोबत शेवटपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ चालवले आणि सरतेशेवटी शिंदे गटाला युती तोडावी लागली. तसाच पॅटर्न आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप राबवते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. शिंदे गटाने भाजपपुढे युतीसाठी हात पुढे केल्यानंतर जागा वाटपावर आता दोन्ही पक्षांत चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात जास्त आमदार असल्याने शिंदे गटाला जास्त जागा हव्या आहेत, तर भाजप वाढलेले बळ पाहता तेवढ्या जागा द्यायला तयार नाही. उलट शिंदे गटापेक्षा जास्त जागा लढविण्यासाठी भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. सोमवारी (१९ जानेवारी) रात्री उशिरापर्यंत जालना रोडवरील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक चालली. मात्र तोडगा निघू शकला नाही.
युती होण्याची शक्यता कमीच...
सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपचे नेते सुरेश बनकर आणि पदाधिकारी आक्रमक असतात. तशीच परिस्थिती वैजापूरमध्येही आहेत. रमेश बोरनारे यांच्याविरोधात नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी आणि पदाधिकारी आक्रमक असतात. पैठणमध्येही तीच परिस्थिती आहे. दत्ता गोर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने आता भाजपकडून आक्रमकपणे भुमरे पिता-पुत्रांविरुद्ध मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत युतीसाठी होणाऱ्या बैठका पाहता वेळकाढूपणा तर सुरू नाही ना, अशी शंका येण्यास बराच वाव आहे. शक्य तिथे भाजपसोबत युती करण्याची सूचना एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चूक भोवल्याने आता ठाकरे गट जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ताकही फुंकून पित आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणुकीला सामोरे जाण्याची ठाकरे गटाने केली आहे. सोमवारी (१९ जानेवारी) तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सहा तास चालली. मात्र जागा वाटपावर मतैक्य झाले नाही. बैठकीला ठाकरे गटाकडून आ. अंबादास दानवे, मुरलीधर चौधरी, तालुकाप्रमुख अशोक शिंदे, बाळासाहेब थोरात, काँग्रेसकडून जगन्नाथ काळे, किरण डोणगावकर, विश्वास औताडे, वंचित बहुजन आघाडीकडून अमित भुईगळ, योगेश बन आदींची उपस्थिती होती. या निवडणुकीत शरद पवार गटालाही सोबत घेण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली आहे. मनपा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची सूत्रे चंद्रकांत खैरे यांनी हाती घेतल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांना पहिल्या बैठकीलाही बोलाविण्यात आले नाही. बैठक आ. दानवे यांच्या कार्यालयात झाली. खैरे हे बैठकीला नसल्याद्दल आ. दानवे यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, की खैरे यांच्या मार्गदर्शनाखालीच संपूर्ण जागा वाटप होईल.
अवघ्या एका जागेमुळे एकहाती सत्ता न येऊ शकलेल्या भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाकडे हात पुढे केला आहे. बदल्यात शिंदे गटाला काय देणार हा प्रश्न नंतर सोडवला जाईल, असे भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, ५ नगरसेवकांनी स्वतःहून बिनशर्त पाठिंब्यासाठी संमती दर्शवली असताना भाजपने ही भूमिका घेतली आहे. शिंदे गटाकडेही भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. सत्तेपासून दूर शिंदे गटही राहू शकत नाही. शितोळे म्हणाले, की निवडणुकीत आम्ही केवळ विकासाचे मुद्दे मांडले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले नाहीत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बिडकीनजवळील जुगार अड्ड्यावर छापा, ‘या’ ७ जणांना पकडले!
By City News Desk
१६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले, छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळची घटना
By City News Desk
Latest News
21 Jan 2026 17:23:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत लॉजवर गेल्यानंतर तिने ब्लॅकमेल सुरू केल्याने ५१ वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीतच...

