प्रहारचे कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनात सोडण्यासाठी घेऊन आले साप… पुढे घडला हा ड्रामा…

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज, १४ ऑगस्टला विद्यापीठात पिशवीत साप घेऊन आले होते. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या दालनात त्‍यांना साप सोडायचा होता. पोलिसांनी मध्यस्थी करून कुलगुरूंशी त्‍यांची भेट घडवून आणली. त्‍यामुळे कार्यकर्त्यांनी पिशवीतला साप बाहेर काढला नाही. नक्की कशामुळे आंदोलन?सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजंदारी कामगारांचे आंदोलन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज, १४ ऑगस्टला विद्यापीठात पिशवीत साप घेऊन आले होते. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या दालनात त्‍यांना साप सोडायचा होता. पोलिसांनी मध्यस्थी करून कुलगुरूंशी त्‍यांची भेट घडवून आणली. त्‍यामुळे कार्यकर्त्यांनी पिशवीतला साप बाहेर काढला नाही.

नक्की कशामुळे आंदोलन?
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजंदारी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर सेवेत घेण्याची त्‍यांची मागणी आहे. या आंदोलनाला प्रहारनेही पाठिंबा दिला आहे. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्न चर्चा करण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे वेळ मागितली. पण त्‍यांना टाळण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुलगुरूंनी चर्चेसाठी वेळ न दिल्यास बुधवारी त्यांच्या कक्षात साप सोडू, असा इशारा दिला होता.

सर्पमित्र बोलावून ठेवले…
प्रहारच्या आंदोलनाची कल्पना असलेल्या विद्यापीठ प्रशासनाने सर्पमित्रही बोलावून ठेवले होते. बेगमपुरा पोलीसही विद्यापीठात दाखल झाले. मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वार कुलूपबंद केलेले होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, शहराध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी सायंकाळी साप घेऊन आल्यानंतर पोलिसांनी त्‍यांना गाठून समजूत घातली. पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांची कुलगुरूंशी भेट घालून दिल्यानंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १६ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्याची ग्‍वाही कुलगुरूंनी दिली. आ. बच्‍चू कडू यांच्याशीही कुलगुरूंचे बोलणे करून देण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!

Latest News

यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!! यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
यवतमाळ (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध पांढरदेवी यात्रोत्सवात मैत्रिणीसोबत आलेल्या १४ वर्षीय मुलीला बळजबरीने जंगलात...
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
ज्युलियानाचा १० वर्षीय मुलीच्या जीवाशी खेळ; वर्षभर बालमजूर म्हणून राबवले; पुढे तर हद्दच केली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software