अतिक्रमण हटाव मोहिमेला पैठणमध्ये हिंसक वळण!, पोलिसांच्या लाठीमारात एका ग्रामस्थाचे डोके फुटले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागून पोलिसांना लाठीमार करावा लागला. हा प्रकार जायकवाडीत बाजार तळ परिसरातील अतिक्रमणे हटविताना सोमवारी (१५ डिसेंबर) सकाळी ११ ला घडला. पाटबंधारे विभागाचे पथक पोलीस बंदोबस्त घेऊन आले होते. ग्रामस्थांनी विरोध सुरू केला. तरीही पथक जुनामत नसल्याने जेसीबीवर दगडफेक सुरू करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

जायकवाडीतील सरकारी निवासस्थाने पाडल्यानंतर पाटबंधारे विभागाचे पथक सोमवारी सकाळी ११ ला बाजारतळ परिसरातील अतिक्रमणे पाडण्यासाठी आले. कारवाईला ग्रामस्थांनी आक्रमकपणे विरोध करायला सुरुवात केली. त्यांनी पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्‍त्‍यावर ठिय्या मांडला. मात्र तरीही पथक कारवाईसाठी पुढे सरसावले. त्यानंतर ग्रामस्थांनी जेसीबीवर दगडफेक सुरू केली. त्यात जेसीबीच्या काचा फुटल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून ग्रामस्थांना पांगवले. लाठीमारात राजू खडसन या ग्रामस्थाचे डोके फुटले आहे. त्यानंतर तहसीलदार ज्योती पवार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाई एका दिवसासाठी स्‍थगित केली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर ग्रामस्थांसोबत चर्चा केली.

आज, १६ डिसेंबरला सकाळी ग्रामस्थांसोबत पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. राहुलनगर ही ५० वर्षांपासूनची वसाहत असून घरकुल योजनेचा निधी येथे खर्च झालेला असल्याने ती अतिक्रमणे नाहीत, असा दावा करत कुठल्याही परिस्थितीत घरे पाडू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत म्हणाले, की घरे बांधताना आमच्या विभागाची परवानगी घेतली नाही. घरकुल मंजुरीला आधार नाही. आमच्या जागेवरील सर्व अतिक्रमणे हटवू. सोमवारी कारवाई थांबली असली तरी पुन्हा मोहीम राबवून अतिक्रमणे काढूच, असा ठाम भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, ज्या भागात कारवाई होत आहे तो संजयनगर, राजीवनगर, राहुलनगर, राजीव गांधीनगर, दालवाडी हा भाग कातपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा, रस्ते, पथदिव्यांसह अन्य सुविधा दिल्या असून, आता पाटबंधारे विभागाने कारवाई सुरू केल्याने ग्रामस्थ प्रचंड चिडले आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाकेबाज कारवाई... अवघ्या विशीतल्या पोरांनी क्षणीक स्वार्थापोटी करून घेतले आयुष्याचे मातेरे!; नायलॉन मांजाचा साठा बाळगला अन्‌ कायद्याच्या जंजाळात अडकले!!

Latest News

छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाकेबाज कारवाई... अवघ्या विशीतल्या पोरांनी क्षणीक स्वार्थापोटी करून घेतले आयुष्याचे मातेरे!; नायलॉन मांजाचा साठा बाळगला अन्‌ कायद्याच्या जंजाळात अडकले!! छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाकेबाज कारवाई... अवघ्या विशीतल्या पोरांनी क्षणीक स्वार्थापोटी करून घेतले आयुष्याचे मातेरे!; नायलॉन मांजाचा साठा बाळगला अन्‌ कायद्याच्या जंजाळात अडकले!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐन तारुण्यात एक चूक आता अवघ्या विशीतल्या मुलांना कायद्याच्या जंजाळात अडकवणारी ठरली आहे. नायलॉन...
बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, वैजापूर तालुक्यातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या ६ गायी पोलिसांनी वाचवल्या!; हर्सूल ते रेंगटीपुरा, मध्यरात्री पिकअपने घडवला सिनेस्‍टाइल थरार
लाखांची नाही, आता करोडोंची गोष्ट करा... लक्झरी घरे लोकांना करताहेत आकर्षित!, खरेदीदारांची संख्या का वाढत आहे?
इन्व्हर्टरवर चुकूनही चालवू नका या गोष्टी, लगेचच सर्व वीज संपवून टाकतील, नवीन बॅटरी घ्यावी लागेल विकत!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software