श्रद्धा अन् शिस्त... डॉ. अर्पित जैन दोनदा UPSC उत्तीर्ण, सांगितला यशाचा सोपा मार्ग...
यश एका रात्रीत मिळत नाही. जर तुम्ही कठोर परिश्रम केले आणि दृढनिश्चयाने योग्य मार्गाचा अवलंब केला तर यश एकेदिवशी नक्कीच मिळेल. अशीच एक कहाणी अर्पित जैन यांची आहे. ज्यांनी डॉक्टरीनंतर नागरी सेवा निवडली. त्यांनी दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर ते त्यांच्या कामामुळे सतत चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी त्याचा यूपीएससी प्रवास शेअर केला. ही यशोगाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी अशीच आहे.
डॉ. जैन यांनी भारतातील आघाडीच्या वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) येथून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एम.डी.चा अभ्यास केला. वैद्यकशास्त्राचा अभ्यास करत असताना, जैन यांना जाणवले की त्यांना येणाऱ्या अनेक समस्यांचे मूळ रुग्णालयाबाहेर आहे. यामुळे त्यांना खोल समज मिळाली.
समाजात सुधारणा घडविण्यासाठी धोरण आणि सार्वजनिक प्रशासन पातळीवर काम करण्याची गरज असते. याच उद्देशाने प्रेरित होऊन डॉ. जैन यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली आणि ती दोनदा उत्तीर्ण झाली. २०१४ मध्ये ते १९४ व्या क्रमांकासह भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) रुजू झाले.
श्रद्धा अन् शिस्त असेल तर काहीच अशक्य नाही...
डॉ. जैन यांनी आपला यूपीएससी प्रवास शेअर केला. त्यांनी सांगितले, की ते देशातील सर्वात आव्हानात्मक परीक्षा यूपीएससी दोनदा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. कोणतीही परीक्षा आपल्याला वाटते तितकी कठीण नसते. योग्य रणनीती, स्पष्ट मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव असल्यास, जगातील कोणतीही परीक्षा अशक्य नसते. त्यासाठी फक्त श्रद्धा आणि शिस्त लागते.

