अभिनेत्री राशी खन्नाची विशेष मुलाखत : नशिबात असलेले तुमच्यापासून कुणी हिरावू शकत नाही...; फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजूनही हिरोलाच पूजले जाते, पण परिस्थिती हळूहळू बदलतेय... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

दिल्लीची मुलगी राशी खन्नाने "मद्रास कॅफे’ या हिंदी चित्रपटातून अभिनयाच्या मूलभूत गोष्टी शिकल्या आणि लवकरच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये प्रभुत्व मिळवले. संपूर्ण भारतात लोकप्रिय झालेली राशी लवकरच पवन कल्याणसोबत "उस्ताद भगत सिंह’ या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. शिवाय, ती तमिळ चित्रपट "राउडी अँड कंपनी’ आणि हिंदी चित्रपट "तलाखों में एक’ आणि "ब्रिज’मध्ये देखील दिसणार आहे. तिने अजय देवगणसोबत "रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ आणि शाहिद कपूरसोबत ‘फर्जी’मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर छाप पाडली आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये तिला तीन वेगवेगळ्या भाषांमधील तीन चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकांसाठी ओळखले गेले. १२० बहादूर (हिंदी), तेलुसू कडा (तेलगू) आणि अगाथिया (तमिळ) हे ते तीन चित्रपट. कारकिर्दीच्या या टप्प्याबद्दल बोलताना राशी खूप उत्साहित होती. एका खास मुलाखतीत तिने तिच्या कारकिर्दीबद्दल, दिल्ली, मुंबई आणि हैदराबादमधील जीवनाबद्दल आणि तिच्या आवडी-निवडींबद्दल स्पष्टपणे सांगितले. तिचा असा विश्वास आहे की फिल्म इंडस्ट्री अजूनही नायकांची पूजा करते. तिला निश्चिंत जीवनशैली आवडते. ती अनेकदा मुंबईमध्ये ऑटोरिक्षाने फिरते...

प्रश्न : तू दिल्लीत वाढलीस, मुंबईत कारकीर्द सुरू केली आणि आता हैदराबादमध्ये स्थायिक झालीस. या वेगवेगळ्या शहरांनी तुला कसे घडवले?
राशी : खरं सांगायचं तर, कधीकधी मला प्रश्न पडतो की मी कोण आहे, का मी इतक्या भूमिका साकारते आणि त्या साकारताना मी ती भूमिकाच जगते. मग ती तमिळ, तेलुगू असो किंवा अलीकडे पंजाबी, राजस्थानी आणि बंगाली असो, माझा मॅनेजर म्हणतो, तुम्ही संपूर्ण भारतीय आहात (हसते). मी हैदराबादमध्ये राहते. दिल्ली आणि मुंबईमध्येही फिरते. मी खवय्यी आहे. दिल्लीचे जेवण मला खूप आवडते. चांगली गोष्ट म्हणजे माझी आई माझ्यासोबत राहते, म्हणून ती घरी दिल्ली-शैलीचे छोले भटुरे बनवते. पश्चिम दिल्लीत एका मार्केटमध्ये आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी जायचो. मला अजूनही तिथल्या टिक्की आणि पाणीपुरीची आठवण येते. मुंबईची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुरक्षितता. रात्री १२ वाजताही तुम्ही ऑटोरिक्षाने कुठे जाऊ शकता. मी मुंबईत राहत असताना ऑटो-रिक्षाने खूप प्रवास करायचे. आताही मी कधीकधी ऑटोरिक्षा घेतो, पण माझा मॅनेजर मला मनाई करतो. मुंबईबद्दल आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे इथे प्रत्येकजण कामाशी काम ठेवतो.

318343785_661610478946327_730170 (1)

प्रश्न : तू ‘मद्रास कॅफे' या बॉलीवूड चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. मग दक्षिणेकडे कसे वळलीस? हिंदीमध्ये करिअर करण्याचा विचार तू केला नव्हता का?
राशी : खरं तर मी चित्रपट पाहून लहानाची मोठी झाली नाही. मला सिनेमात रस नव्हता. जेव्हा मी "मद्रास कॅफे’ चित्रपटात काम केले तेव्हा मला वाटले नव्हते की मी स्टार होईन किंवा बनू इच्छिते. मला फक्त त्या सेटवर काम करायला मजा आली. त्यामुळे हळूहळू मी अधिक काम करू लागले. मी असा विचारही केला की जर मला "मद्रास कॅफे’ नंतर चांगला चित्रपट मिळाला नाही तर मी दुसरे काहीतरी करेन. पण नंतर मला माझा पहिला तेलुगू चित्रपट मिळाला, जो अनेकांना आवडला. नंतर मला काम मिळत राहिले आणि मी ते करत राहिले. मी कधीही विचार केला नाही की मला हिंदीमध्ये काम करायचे आहे की दक्षिणेत. या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत. जे काही होते ते नशिबात असते, म्हणून मी या गोष्टींना सरेंडर होणे पसंत करते. जिथे मला चांगले चित्रपट मिळतात तिथे मी ते करेन.

प्रश्न : तू कोणत्याही फिल्मी कनेक्शनशिवाय इथपर्यंत पोहोचलीस. बाहेरील व्यक्ती असण्याचे तुला कोणते तोटे वाटलेत?
राशी : गरजेचे नाही की तुमचे काही कनेक्शन आहे म्हणूनच तुम्हाला काम मिळेल. कनेक्शन असल्यास ते थोड्या काळासाठी मिळू शकते. परंतु प्रगतीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. हे खरे आहे की बाहेरून येणाऱ्या आमच्यासारख्या कलाकारांना थोडे अधिक कष्ट करावे लागतात. पण मी कधीही कठोर परिश्रमाला घाबरले नाही. मला माहीत होते की ही परिस्थिती असणार आहे आणि मी त्याबद्दल काहीही करू शकत नाही. माझ्याकडे फक्त माझे कठोर परिश्रम करण्याचे ध्येय होते. मला चित्रपट मिळाला की नाही, त्याची विविध कारणे होती, परंतु मी कधीही स्वतःला असहाय्य ठरवले नाही. मला नकार मिळाला तरी मी हे समजून घेतले, की शेवटी व्यवसाय आहे. ते अन्य कुणाला काम देत असतील तर त्यात वाईट वाटण्यासारखे नाही. मला विश्वास आहे की तुमच्या नशिबात जे आहे ते येणारच आहे. कोणीही ते तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

470601723_122111722634619699_542 (1)

प्रश्न : तू एक खाद्यप्रेमी आहेस. अभिनेत्री झाल्यानंतर डाएटसाठी तुला काही आवडत्या पदार्थांचा त्याग करावा लागला का?
राशी : हो. माझ्या मैत्रिणी माझ्यासमोर जेवत असताना मला अनेकदा नाही नाही म्हणावे लागते. पण मी नेहमीच खूप शिस्तबद्ध राहिले आहे. याचा अर्थ असा नाही, की मी नेहमीच माझ्या खाण्याच्या इच्छांना मुरड घालते. तीन महिने शूटिंग करत असेल आणि आवडत्या पदार्थांबद्दल बंधने घालून घेतली असतील तर शूटिंग झाले की मी मस्त ट्रीप आयोजित करते आणि हवे ते खाते. तुम्ही फक्त निरोगी खाल्ले तर सर्वकाही राखले जाईल. मला गोड पदार्थ खूप आवडत होते. मी खूप गोड खायचे. पण आता मी जवळजवळ बंद केले आहे. त्याचप्रमाणे, मला समोसे आवडतात, पण मी ते खूप कमी केले आहेत. समोसा पाहून मला नेहमीच ते खावेसे वाटतात, पण मी स्वतःला थांबवते.

प्रश्न : बऱ्याच अभिनेत्रींनी फिल्म इंडस्ट्रीमधील असमानतेबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. याबद्दल तुझा अनुभव काय आहे?
राशी : आपला समाज मूळतः पितृसत्ताक आहे. इंडस्ट्रीमध्येही नायकालाच महत्त्व दिले जाते. त्यांना अधिक आदर मिळतो. हळूहळू परिस्थिती बदलत आहे. कारण मुली बोलत आहेत. जरी ते पूर्णपणे बदललेले नसले तरी, सेटवर अभिनेते आणि अभिनेत्रींमधील वागणुकीत निश्चितच फरक पडला आहे. मानसिकता बदलत आहे. वेळ लागेल, पण परिस्थिती बदलेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!

Latest News

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या! वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत लॉजवर गेल्यानंतर तिने ब्लॅकमेल सुरू केल्याने ५१ वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीतच...
कन्नड हादरले : वंदनाने गुप्तांग दाबून मारले, धीरजने डोक्यात घातले शस्‍त्राचे वार, माजी सरपंचपूत्राच्या हत्‍येचे गूढ उकलले!!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी ‘व्हॉइस ऑफ फ्युचर’ सेमिनार!, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजकांची नोंदणी सुरू...
बिडकीनजवळील जुगार अड्ड्यावर छापा, ‘या’ ७ जणांना पकडले!‌
१६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले, छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software