- News
- सिटी डायरी
- बाळासाहेब आंबेडकर अन् मी एकत्र आलो तर... छत्रपती संभाजीनगरमध्ये रामदास आठवलेंनी केली अपेक्षा व्यक्त...
बाळासाहेब आंबेडकर अन् मी एकत्र आलो तर... छत्रपती संभाजीनगरमध्ये रामदास आठवलेंनी केली अपेक्षा व्यक्त, म्हणाले...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : न्यायालयाने राममंदिराचा प्रश्न सोडवला, तसा बुद्धगयेचा प्रश्नदेखील सोडवावा. आमची मागणी केवळ त्या ट्रस्टमध्ये सर्व सदस्य बौद्ध असावेत, एवढीच आहे. बुद्धगयेचे महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात असले पाहिजे. ते मिळणारच आहे. हा प्रश्न राममंदिर व बाबरी मशिदीसारखा गंभीर नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) व्यक्त केले.
३ एप्रिलपर्यंत माझा राज्यसभेचा कार्यकाळ असून, १२ वर्षांपासून मी राज्यसभेत आहे. आता संधी मिळाली तर रेकॉर्डब्रेक करू शकतो. मला नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र आलो, तर समाजाला चांगले भवितव्य आहे. पण, बाळासाहेबांना हे मान्य नाही. ते निवडणुकांमध्ये सतत प्रयत्न करीत आहेत, पण अपेक्षित मतदान घेऊ शकत नाहीत. प्रभाग पद्धत रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही आठवले म्हणाले. महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, महाविहाराच्या कायद्यात सुधारणा करावी, या महाविहाराचा चेअरमन बौद्ध असावा, सर्व ट्रस्टी बौद्ध असावेत, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात चार महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिल्याचे आठवले म्हणाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या आत्महत्येने रांजणगाव शेणपुंजी हादरले!
By City News Desk
वाळूज MIDC त अनधिकृतरित्या पुतळा बसवला, गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
28 Feb 2026 22:02:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती वारल्याने आईकडे राहणाऱ्या विधवा तरुणीचे जगणे एका रोडरोमिओने मुश्कील केले आहे. लग्न करण्यासाठी...

