आदर्श पतसंस्थेच्या आणखी ३१ मालमत्ता सापडल्या; आधीच्या ४६ मालमत्तांचा लिलाव होणार केव्हा?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४६ संपत्तीच्या लिलावाला परवानगी मिळूनही लिलाव झालेला नाही. त्‍यानंतर आता ३१ मालमत्तांच्या लिलावासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. ३५.१४ कोटींच्या या ३१ मालमत्ता आहेत. यापूर्वीच्या ४६ मालमत्ता या ५८.१८ कोटींच्या आहेत. त्‍यांच्या लिलावाला मुहूर्त कधी लागतो, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. आदर्श पतसंस्थेच्या संचालक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४६ संपत्तीच्या लिलावाला परवानगी मिळूनही लिलाव झालेला नाही. त्‍यानंतर आता ३१ मालमत्तांच्या लिलावासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. ३५.१४ कोटींच्या या ३१ मालमत्ता आहेत. यापूर्वीच्या ४६ मालमत्ता या ५८.१८ कोटींच्या आहेत. त्‍यांच्या लिलावाला मुहूर्त कधी लागतो, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

आदर्श पतसंस्थेच्या संचालक आणि व्यवस्थापकांच्या वैयक्तिक नावावर असलेल्या ५८.१८ कोटींच्या ४६ संपत्तींच्या लिलावाला गृह विभागाने ऑगस्टमध्येच मंजुरी दिली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना या प्रक्रियेत लक्ष घालून वेगाने प्रक्रिया करण्याचे आदेश दिलेले आहेत. सप्टेंबरमध्ये लिलाव होणे आवश्यक असताना आता नोव्‍हेंबर उलटला आहे. आता आर्थिक गुन्हे शाखेने अंबादास मानकापे व आदर्श पतसंस्थेच्या आणखी ३१ मालमत्ता शोधून काढल्या आहेत. त्‍यांची किंमत ३५ कोटींच्या घरात आहे. या मालमत्तांच्या लिलावाच्या परवानगीसाठी पोलीस महासंचालकांकडे प्रस्‍ताव पाठविण्यात आला आहे. एकूण ७१ मालमत्तांमधून ९४ कोटी रुपये मिळतील, अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. पोलीस निरीक्षक संभाजी पवार आदर्श पतसंस्थेच्या मालमत्तांच्या लिलावासाठी प्रयत्‍नशील आहेत.

आदर्श पतसंस्थेचा एकूण २०२ कोटींचा घोटाळा असून, फसवणुकीची एकूण रक्‍कम २८७ कोटी ७६ लाख ६९ हजार ३२५ रुपयांच्या घरात आहे. पतसंस्थेच्या एकूण ९२,१६४ ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. दरम्‍यान, ठेवीदारांचे पैसे कधी परत मिळणार याबाबत प्रशासक सुरेश काकडे यांनी सांगितले, की ६ नोव्हेंबरपर्यंत २ हजार ५९६ ठेवीदारांना २ कोटी ५६ लाख ३८ हजार रुपये परत करण्यात आले आहेत. सध्या पतसंस्थेत १.५ कोटी रुपये असून २५,९०० ठेवीदारांना पैसे परत करण्याचे उद्दिष्ट आम्‍ही ठेवले आहे. ठेवीदारांनी अर्ज केल्यास तत्काळ पैसे परत करू, असे ते म्‍हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software