गुलाबराव पाटलांनी तोंडावर बोट ठेवत सत्तारांना गप्प बसण्याचा इशारा का केला?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी (२३ सप्टेंबर) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री अब्‍दुल सत्तार हे पुरस्कार वितरणाला चार वर्षे उशीर का झाला, याचा खुलासा करत असताना गुवाहाटीचे कारण सांगत होते, त्‍यावर लगेचच मंत्री गुलाबराव पाटील यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी (२३ सप्टेंबर) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री अब्‍दुल सत्तार हे पुरस्कार वितरणाला चार वर्षे उशीर का झाला, याचा खुलासा करत असताना गुवाहाटीचे कारण सांगत होते, त्‍यावर लगेचच मंत्री गुलाबराव पाटील यांनी तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा केला…मात्र तरीही सत्तारांनी आपले घोडे पुढे दामटलेच! कार्यक्रमात राजकीय कोपरखळ्यांनी हास्यकल्लोळात सभागृह डुंबून गेले!!

सन २०१८-१९, २०२९-२०, २०२०-२१, २०२१-२२ अशा एकत्रित स्वच्छ ग्राम स्पर्धांचे पुरस्कार वितरण झाले. अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक ई. रविंद्रन, अतिरिक्त संचालक शेखर रौंदळ, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची उपस्थिती होती.

मंत्री सत्तार म्हणाले, की पुरस्कार वितरणाला चार वर्षे उशीर झाला. पण त्यामागे कारणे आहेत. दोन वर्षे कोरोनात गेली आणि दोन वर्षे गुवाहाटीमुळे, हे मला आणि गुलाबराव यांनाच माहिती आहे… सत्तार हे बोलत असतानाच, गुलाबराव पाटलांनी तोंडावर बोट ठेवत गप्प बसण्याचा इशारा केला. ते पाहून सत्तार म्हणाले, अहो, पुरस्कार वितरणाला एवढा उशीर का झाला, हेच मी सांगतोय. तुम्ही म्हणता बोलू नका. पण, ते सांगावेच लागेल.’देर आए दुरुस्त आए, लेकीन हमारे पिरिएडमेच आए’. आम्हाला आता बोलण्यासाठी अजून ४५ दिवस बाकी आहेत. आता एक-दोन कॅबिनेट होऊ शकतात, असे सत्तार म्हणाले.
सत्तारानंतर गुलाबराव पाटील यांचे भाषण झाले, ते म्हणाले, की अब्दुल सत्तार हे आमच्या मंत्रिमंडळातील विनोदी पार्ट करणारे मंत्री आहेत. चळवळ करून, संघर्षांना तोंड देऊन या पदापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. माणसांमध्ये राहणारे आम्ही लोक आहोत. काम करणाऱ्याला निवडून देण्यासाठी जनता जात, धर्म, पक्ष बघत नसतात. त्यामुळे आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा आपणच सरकारमध्ये येऊ. आपणच मंत्री होऊ. लागले तर माझे मंत्रिपद तुम्ही घ्या, असे ते सत्तारांना म्हणाले.

स्पर्धेमुळे गावागावात स्वच्छतेसाठी चढाओढ
स्पर्धेमुळे गावागावात स्वच्छतेसाठी चढाओढ लागली ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती आहे, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. गावाला मिळणारा पुरस्कार हा गावाचे वैभव असतो. आपलं गाव स्वच्छ असावं असे तरुणांना वाटते हे या अभियानाचे यश आहे. गाव स्वच्छ तर मन स्वच्छ. सर्व गावाने मिळून एकोप्याने काम केलं तर नक्कीच गावाची प्रगती होऊ शकते. त्यासाठी गावकऱ्यांनीही आपले सर्व कर नियमित भरणे आवश्यक असते. तसे केले तरच ग्रामपंचायतीकडून लोकांना सेवा दिली जाऊ शकते. ही स्पर्धा तांड्या- वाड्यांपर्यंत नेण्यासाठी तसेच स्पर्धेतील पारितोषिकाची रक्कम वाढविणे ही बाबही शासनाच्या विचाराधीन आहे,असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अभियान संचालक ई रविंद्रन यांनी केले. अभियानाबाबत विभागाची भूमिका प्रधान सचिव संजय खंदारे यांनी मांडली. विजय कदम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला राज्यभरातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software