अतिवृष्टीने १०० टक्‍के नुकसान, सरकारचे केवळ शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे नाटक, प्रत्‍यक्षात पंचनाम्याला कुणी येईना, शेतकऱ्याने घेतले विष!, सोयगाव तालुक्‍यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्‍टर्सवरील पिकांचे १०० टक्‍के नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याची घोषणा केली, मात्र प्रत्‍यक्षात यंत्रणा हलायला तयार नाही. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतात महसूल व कृषी विभागाचे पथक पाच दिवसांपासून येत नसल्याने संतापलेल्या रामेश्वर हिरा राठोड (वय २५) या अल्पभूधारक शेतकऱ्याने विष पिऊन आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. ही खळबळजनक घटना मंगळवारी (२३ सप्‍टेंबर) दुपारी १२ वाजता सोयगाव तालुक्‍यातील धिंगापूर शिवारात घडली.

राठोड यांची धिंगापूर शिवारात ५० आर शेती असून, १६ व १७ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पाण्यात त्यांच्या शेतातील कपाशीचे पीक वाहून गेले. महसूल व कृषी विभागाला कळवूनही पाच दिवसांपासून कुणीच पंचनाम्यासाठी आले नाही. सरकारकडून कोणताही दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने हवालदील झालेल्या राठोड यांनी विष पिले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना आधी सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात, नंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

तहसीलदार मेनेंचे हात वर...
सोयगाव तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्‍याचे पंचनामे करायला यंत्रणेला वेळ नसल्याचे चित्र आहे. सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने यांचे यंत्रणेवर नियंत्रणच उरले नसल्याचे दिसून येते. त्‍यांनी या घटनेची आपणास माहिती नाही, असे सांगून हात वर केले. जरंडीचे ग्राम महसूल अधिकारी यश बागुल एका महिन्याच्या रजेवर आहेत. त्यांचा पदभार घोसलाचे ग्राम महसूल अधिकारी गव्हाणे यांच्याकडे आहे. गव्हाणेसुद्धा गायब आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software