- News
- सिटी डायरी
- दिवाळीपूर्वी होणार मनपाच्या २ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार
दिवाळीपूर्वी होणार मनपाच्या २ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : महापालिकेतील २ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार ५ महिन्यांपासून थकला आहे. तो आता दिवाळीपूर्वी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचे आदेश महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी (६ ऑक्टोबर) मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांना दिले आहेत.
मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सी आणि महापालिका प्रशासन यांच्यात सध्या वाद सुरू आहे. त्यामुळे दोन हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी ५ महिन्यांपासून वेतनाविना आहेत. या वादात दोन छोट्या एजन्सींकडे कर्मचारी वर्ग करण्यात आले होते. सुरुवातीला दोन महिन्यांचा अॅडव्हान्स पगार देण्याची तयारी दर्शवणाऱ्या या दोन्ही एजन्सींनी पगार देण्याची वेळ आल्यावर माघार घेतली. त्यामुळे कर्मचारी घायकुतीला आले आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार करायला महिन्याकाठी किमान ५ कोटी रुपये लागतात, असे सूत्रांकडून समजते. पगार मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही केले. अखेर आता दिवाळीपूर्वी त्यांचा पगार होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

