छत्रपती संभाजीनगरमध्ये पती, दिराच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्‍महत्‍या, तिने विष पिल्यावर पतीने सासऱ्याला कॉल केला अन्‌ सांगितलं, तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो...

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पती व दीराच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळशी तांडा येथे समोर आली आहे. विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करून विवाहितेला पती व दिराकडून झालेल्या छळाची तक्रार केली. पोलिसांनी पती व दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्‍हणजे, विवाहितेने विष पिल्यानंतर तिच्या पतीने सासऱ्याला कॉल केला आणि सांगितले, की मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो... यातून क्रूरता समोर आली आहे.

नवनाथ फुलसिंग जाधव (वय ५५, रा. आडुळ तांडा, ता. पैठण) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी, मुलगा प्रकाश जाधव, सून वंदना जाधव यांच्यासह राहतात. त्यांना एक मुलगा व तीन मुली आहेत. लहान मुलगी कविताचे लग्न सन २०११ मध्ये दिनेश खंडू राठोड रा. पळशी तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर याच्यासोबत झाले होते. तिला एक मुलगा, एक मुलगी आहे. कविताला दिनेशने लग्नानंतर तीन वर्षे चांगले नांदवले. नंतर तू घर खर्चासाठी माहेराहून पैसे आण, असे म्हणून मारहाण, शिवीगाळ करू लागला. तिचा भाया गणेश खंडु राठोड हादेखील माहेराहून पैसे आण, असे म्हणून कविताला मारहाण करून शिवीगाळ करायचा.

कविताने महिला तक्रार निवारण कक्षात तक्रारही केली होती. तिथे सासरच्या लोकांना पोलिसांनी समजावूनही सांगितले होते. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७ ला कविताने फोन करून वडिलांना सांगितले, की माझा नवरा मला मारहाण करत आहे. तेव्हा वडिलांनी समजावले, की दोघेही भांडू नका. मी उ‌द्या सकाळी येतो. त्यानंतर रात्री १० ला जावई दिनेशने कॉल करून सांगितले, की तुमच्या मुलीने औषध घेतले असून तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो. पण घेऊन चाललो... असे म्हणून फोन स्वीच ऑफ केला. त्यानंतर मध्यरात्री १२ ला मुलीची जाऊ दुर्गा राठोड हिने जावयाच्या फोनवरून कॉल करून सांगितले, की काका तुम्ही लवकर या. कविता खूप सिरियस आहे.

रात्री जाण्यासाठी काही साधन नसल्याने १ सप्‍टेंबरला सकाळी सहालाच कविताचे वडील घाटी रुग्णालयात आले. कविता बेशुद्धावस्थेत होती. दुपारी ३ ला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर कविताच्या सासरी पळशी तांडा नं. ०२ येथे अंत्यविधी करून तिच्या वडिलांनी मंगळवारी (२ सप्‍टेंबर) चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कविताचा पती दिनेश खंडू राठोड व तिचा भाया गणेश खंडु राठोड यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने कंटाळून व सतत माहेराहून पैसे आण असा तगादा लावल्याच्या कारणावरून कविताने विष पिऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?

Latest News

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल? Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?
लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. २२ सप्टेंबरपासून माँ दुर्गा तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. माँ दुर्गेच्या या दिवसांमध्ये,...
Special interview : अभिनेत्री वाणी कपूरने दिला कानमंत्र; धीर ही अशी किल्ली, जी प्रत्येकाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते!
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्‍यू
मोठी बातमी : हर्सूल जेलमध्ये ५ कैद्यांचा राडा!; तुरुंगाधिकाऱ्यांना मारहाण, इतके आक्रमक झाले की कर्मचाऱ्यांनाही ऐकत नव्हते..., नक्की काय अन्‌ कशामुळे घडलं जाणून घ्या...
वेळेत पोलिसांची गाडी आल्याने कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांची लूट टळली!; तिघांना अटक, धूत हॉस्पिटलसमोरील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software