प्रेमविवाह केलेल्या मुलीचे कुंकू पुसणाऱ्या नराधमाला जालन्यातून अटक, छ. संभाजीनगरच्या इंदिरानगरात घडले होते ‘सैराट’स्टाइल कांड, अटकेतील आरोपींची संख्या ३ वर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इंदिरानगरात घडलेल्या सैराट स्‍टाइल कांडाचा प्रमुख आरोपी गीताराम भास्कर किर्तीशाही याला जवाहरनगर पोलिसांनी जालन्यातून अटक करून आणले. तो जालन्यातील जावयाकडे लपून बसला होता. त्‍याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्‍हणून या नराधमाने पुतण्यासह मिळून तिचा पती अमित मुरलीधर साळुंके (२५) याची चाकूने भोसकून हत्‍या केली होती. शनिवारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इंदिरानगरात घडलेल्या सैराट स्‍टाइल कांडाचा प्रमुख आरोपी गीताराम भास्कर किर्तीशाही याला जवाहरनगर पोलिसांनी जालन्यातून अटक करून आणले. तो जालन्यातील जावयाकडे लपून बसला होता. त्‍याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्‍हणून या नराधमाने पुतण्यासह मिळून तिचा पती अमित मुरलीधर साळुंके (२५) याची चाकूने भोसकून हत्‍या केली होती.

शनिवारी या प्रकरणात मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाहीच्या मुसक्या पोलीस उपायुक्‍त नितीन बगाटे यांच्या पथकाने आवळल्या होत्‍या. जवाहरनगर पोलिसांकडून मुख्य आरोपी गीतारामचाही युद्धपातळीवर शोध सुरू होता. तो जालन्यातील जावई स्वप्नील पटेकर (वय २८) याच्याकडे लपून बसल्याचे कळताच पोलिसांनी जालन्यातून त्‍याला अटक केली. त्‍याच्या जावयालाही अटक केली. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या ३ झाली आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घटनेची पार्श्वभूमी…
इंदिरानगरमध्ये ही घटना घडली होती. खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे लहानपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. ही दोन्ही कुटुंब इंदिरानगरमध्ये राहतात. हा विरोध मोडीत काढून दोघांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले होते. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारले. त्‍यामुळे ते २ मे रोजी घरी परतले. त्यांचा संसार सुरू झाला.मात्र, खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी गेलेल्या विद्याच्या पित्‍याचा राग राग कायम होता. तिचा पिता गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलैला रात्री अमित शतपावलीसाठी बाहेर पडला असता गीताराम व आप्पासाहेबने त्याला एकटे गाठून जीवघेणा हल्ला चढवला. चाकूने त्याच्यावर गंभीर वार केले. यात अमित गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. २५ जुलैला त्याची प्राणज्योत मालवली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध

Latest News

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची...
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software