इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगोची मुंबईसाठीची सायंकाळची विमानसेवा २९ मार्चपासून नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणार आहे. ऑनलाइन आरक्षण प्रणालीत तसा बदलही करण्यात आला आहे.

सध्या सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत इंडिगोकडून मुंबईसाठी विमानसेवा सुरू आहे. सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही दोन्ही विमाने छत्रपती संभाजीनगरसाठी उड्डाण भरतात आणि उतरतात. उन्हाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर यातील सायंकाळची विमानसेवा नवी मुंबई विमानतळावरून चालवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार असून, ही बाब वेळखाऊ आणि किचकट ठरणार आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी केली आहे.

असे असेल नवे वेळापत्रक...
-मुंबईचे सकाळचे विमान सध्या मुंबईहून सकाळी ६:१० वाजता निघून ७:२० वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात उतरते. ते २९ मार्चपासून मुंबईहून पहाटे ५:३५ वाजता उड्डाण घेईल आणि ६:४५ वाजता शहरात येईल. परतीच्या प्रवासात सध्या हे विमान शहरातून सकाळी ७:५० उड्डाण घेते आणि ८:४५ वाजता मुंबईत पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार हे विमान सकाळी ७:१५ वाजता उड्डाण घेईल आणि ८:१५ वाजता मुंबईत पोहोचेल.
-मुंबईचे सायंकाळचे विमान सध्या मुंबईहून सायंकाळी ७:३५ वाजता निघून ८:४५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येते. ते २९ मार्चपासून नवी मुंबईहून सायंकाळी ७:३० वाजता निघून ८:२५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येईल. परतीच्या प्रवासात सध्या हे विमान शहरातून रात्री ९:१५ उड्डाण घेते आणि रात्री १०:१० वाजता मुंबईत पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार हे विमान रात्री ८:५५ वाजता उड्डाण घेईल आणि रात्री ९:५० वाजता नवी मुंबईत पोहोचेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Latest News

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software